देश

विरोधकांकडून पाच वर्षांत एकदाही 'भूकंप' नाही : पंतप्रधान

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तीन दशकानंतर पूर्ण बहुमताचे सरकार 2014 मध्ये सत्तेवर आले. आमच्या कार्यकाळात सर्वांत जास्त महिलांची संख्या असलेली संसद राहिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच यापूर्वी विरोधकांकडून देशात भूकंप येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. अद्याप भूकंप आलेला नाही, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी लोकसभेत बोलत होते. ते म्हणाले, परराष्ट्र आणि संरक्षण या महत्वाच्या खात्यातही महिला मंत्री विराजमान आहेत. इतकेच नाहीतर लोकसभा अध्यक्षही महिला आहेत. सभागृहातील सर्व सदस्यांचा गौरवपूर्ण सहभाग आहे. जागतिक पातळीवर भारताची प्रगती होत आहे. भारत जगात आता सहाव्या क्रमांकावर आहे. जगातील प्रतिष्ठित संस्था कोणत्याही अडचणीविना आपली इच्छा व्यक्त करत आहे. भारत अत्याधुनिकतेत प्रगती करत आहे. जग जागतिकीकरणाची चर्चा करत आहे. जास्तीत जास्त क्षेपणास्त्र निर्मितीत भारत आघाडीवर आहे. जगातील कोणत्याही देशात बहुमताचे सरकार असलेला पंतप्रधान जातो तेव्हा काय प्रतिष्ठा मिळते याचा अनुभव मी घेतलाय.   

219 विधेयक मांडण्यात आले यातील अनेक विधेयक मंजूर करण्यात आले. बेहिशेबी मालमत्ता, आर्थिक गैरव्यवहार यांसारख्या विषयांवर कायदेशीर कारवाईसाठी कायद्याची निर्मिती या सभागृहाने केली. याच सभागृहाने जीएसटीसाठी रात्री 12 वाजता संसदेत सुरवात केली. आधारची अंमलबजावणी आमच्या सरकारने केली.

तसेच देशातील 1400 पेक्षा अधिक कायदे आमच्या सरकारने रद्द केले. खासदारांवर विविध मुद्यांवर टीका केली जात होती. यापूर्वी विरोधकांकडून देशात भूकंप येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. अद्याप भूकंप आलेला नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT