Priyanka Gandhi
Priyanka Gandhi 
देश

Loksabha 2019 : हे फक्त श्रीमंतांचे चौकीदार; प्रियांका गांधींचे टीकास्त्र 

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील भाजपच्या नेत्यांवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा यांनी आज जोरदार टीका केली. "हे 'चौकीदार' फक्त श्रीमंतांसाठी काम करतात, त्यांना गरिबांशी काही देणे-घेणे नाही,'' अशा शब्दांत प्रियांका यांनी हल्लाबोल केला आहे. 
उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकीची रक्कम दहा हजार कोटी रुपयांच्या पुढे गेली असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यावरून प्रियांका यांनी उत्तर प्रदेशातील भाजपच्या सरकारवर टीका केली.

"ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कुटुंबे दिवस-रात्र शेतात राबत आहेत, मात्र त्यांची थकीत देणी देण्याची जबाबदारी उत्तर प्रदेशातील सरकार उचलण्यास तयार नाही,'' असे प्रियांका म्हणाल्या. राज्यातील ऊस उत्पादकांचे दहा हजार कोटी रुपये राज्य सरकारने थकविले आहेत, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मुलांसमोर शिक्षण, आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, त्याकडे लक्ष्य देण्यास सरकारला वेळ नाही. हे 'चौकीदार' फक्त श्रीमंतांसाठी काम करतात, त्यांना गरिबांशी काहीही देणे-घेणे नाही, अशी टीका प्रियांका यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: मागील १० वर्षांमध्ये मोठ्या बाता मारण्यात आल्या. परंतु, तुमच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही - प्रियांका गांधी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT