Rahul Gandhi
Rahul Gandhi  
देश

अर्थसंकल्प अगदीच फुसका निघाला: राहुल गांधी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (बुधवार) संसदेत मांडलेला अर्थसंकल्प अगदीच फुसका असल्याची कडवट प्रतिक्रिया कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

राहुल म्हणाले -

  • या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीही नाही. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनामधून सरकारची कोणतीही दृष्टी दिसून येत नाही. "मनरेगा' या योजनेबद्दलही सरकारचा मूलभूत गैरसमज दिसून आला. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीही घोषित करण्यात आलेली नाही.
  • या अर्थसंकल्पामध्ये रोजगारनिर्मितीसाठी नव्या कल्पना मांडलेल्या नाहीत.
  • राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधील भ्रष्टाचार रोखण्याकरिता करण्यात आलेल्या उपाययोजनेस आमचा पाठिंबा आहे
  • या अर्थसंकल्पाचा निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही.
  • आम्हाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमामधून मोठ्या आतिषबाजीची अपेक्षा होती. मात्र हा अर्थसंकल्प अगदीच फुसका निघाला


गांधी यांच्याशिवाय या अर्थसंकल्पासंदर्भात कॉंग्रेस व इतर पक्षीय नेत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे -


या अर्थसंकल्पात शेतकरी आणि बेरोजगार युवकांसाठी काहीच नाही. अर्थसंकल्प म्हणजे लोकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न आहे.
- कमलनाथ, कॉंग्रेस नेते

सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सुधारणांना परिपूर्ण असा हा अर्थसंकल्प आहे.
- मुख्तार अब्बाल नक्वी, भाजप नेते

राजकीय पक्षांना रोख निधी स्वीकारण्याची मर्यादा 20 हजारांवरून 2 हजारांवर आणण्यासंदर्भातील निर्णयाला अर्थच नाही. कारण, यामध्ये कोठेही देणगीदारांचा आकडा मर्यादित करण्यात आलेला नाही.
- योगेंद्र यादव, स्वराज पक्षाचे नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT