देश

राहुल गांधींच्या ट्रॅक्टरला पोलिसांचा 'ब्रेक', नेत्यांनाही घेतलं ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राहुल गांधी यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहचले. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी यांनी आज ट्रक्टरवर स्वार होत मोदी सरकारचा विरोध केला. पण राहुल गांधी संसदेत पोहचल्यानंतर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ट्रॅक्टरसह काँग्रेस नेत्यांनाही ताब्यात घेतलं. या सर्व घटनेमुळे सोशल मीडियावर काँग्रेस समर्थक नेटकऱ्यांनी दिल्ली पोलीस आणि मोदी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली.

सध्या संसदेचं मान्सून सत्र सुरु असल्यामुळं परिसरात कलम 144 लागू आहे. असं असतानाही राहुल गांधी काँग्रेस नेत्यासह ट्रक्टरवर स्वार होत संसदेत पोहचले. राहुल गांधी संसदेत पोहचले मात्र, नियमांचं उल्लघंन केल्याप्रकरण पोलिसांनी रणदीप सुरजेवाला आणि श्रीनिवास बी.वी या नेत्यांसह ट्रक्ट्रर आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

संसदेत दाखल होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी मोदींच्या धोरणार टीका केली. ते म्हणाले, "आम्ही शेतकऱ्यांचा संदेश घेऊन संसदेत आलो आहोत. शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. सरकारला शेती कायदे मागे घ्यावेच लागतील. हे कायदे 2-3 बड्या उद्योगपतींसाठी आहेत. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाहीत, नफ्यासाठी नाहीत. हे काळे कायदे आहेत."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT