rajysabha farm bill 
देश

राज्यसभेतही १२७ व्या घटनादुरुस्तीचं विधेयक पूर्णबहुमतानं पारित!

विनायक होगाडे

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाची यादी तयार करण्याचा अधिकार राज्यांना पूर्ववत बहाल करणारं १२७वी घटनादुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत देखील संपूर्ण बहुमतानं मंजूर झालं आहे. काल हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं होतं. काल या विधेयकावर दिवसभर चर्चा झाली होती. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ३८६ विरुद्ध शून्य मताने ते संमत करण्यात आलं होतं. त्यानंतर आज हे विधेयक चर्चेसाठी राज्यसभेत मांडलं गेलं. या विधेयकाच्या बाजूने १८७ मतं पडली. आज राज्यसभेतील मिळालेल्या या मंजूरीनंतर आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर ही घटनादुरुस्ती अंमलात येईल. मात्र, यामध्ये ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची बाब केंद्राने राज्यांकडेच ढकलली आहे.

गेल्या दोन आठवडे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज होऊ शकलेले नाही. शेती कायदे, पेगॅसस प्रकरण या मुद्द्यांवरून विरोधी पक्ष केंद्र सरकारविरोधात एकत्र आले. या दोन मुद्द्यांवरून दररोज गदारोळ होत होता. मात्र, ओबीसी आरक्षणासंबंधी विधेयक काल सरकारने लोकसभेत आणले. त्यापूर्वी सर्वच विरोधी पक्षांनी या विधेयकावर चर्चा करण्यास सहमती दर्शविली होती. त्यानुसार आज सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर कोणताही गदारोळ न होता विधेयकावर चर्चा सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT