देश

नोटाबंदीविरोधात तीव्र आंदोलन करणार - ममता बॅनर्जी

पीटीआय

कोलकाता - केंद्र सरकार प. बंगालला जाणीवपूर्वक लहान नोटांचा पुरवठा करत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. इतर राज्यांना नोटांचा पुरवठा करून केंद्र सरकार बंगालबरोबर भेदभाव करत असून, याविरोधात मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

नोटाबंदीच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले असून, आज त्यांनी येथील रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यालयास भेट दिली. त्या वेळी पत्रकारांशी त्या बोलत होत्या.

ममता म्हणाल्या, 'राज्याला अद्यापपर्यंत 500 रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात मिळालेल्या नाहीत. तसेच शंभर, पन्नास आणि दहा रुपयांच्या नोटांचाही तुटवडा भासत आहे. एकिकडे राजस्थान, मध्य प्रदेश व इतर राज्यांत या नोटा उपलब्ध झाल्या असून, केंद्र सरकार बंगालसोबत भेदभाव करत आहे.''

लोकांना त्यांच्याच खात्याची माहिती उपलब्ध होत नाही. त्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यांचे पैसे सुरक्षित आहेत का, असा प्रश्‍न ममता यांनी उपस्थित करत हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा नवीन नोटांबरोबर चलनात ठेवाव्यात, या मागणीचा पुनरुच्चार केला. तृणमूल कॉंग्रेसने केंद्र सरकारला दिलेला 72 तासांचा अल्टिमेटम सोमवारी संपत असून, परिस्थितीत सुधारणा न झाल्यास 21 नोव्हेंबरनंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी शेवटी सांगितले.

नोटाबंदीमुळे देशातील ग्रामीण भाग पुरता हैराण झाला असून, शेतकरी वर्ग अश्रू ढाळत आहे. सामान्य माणसाला खायला अन्न नाही. त्यांनी काय खायचे, प्लॅस्टिकच्या नोटा.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT