देश

अकरा मुलींच्या खूनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सीबीआयला नोटीस

वृत्तसंस्था

नवी दिल्ली ः बिहारमधील मुझफ्फरपूर येथील मुलींच्या निवारागृहातील अकरा मुलींच्या खूनप्रकरणी चौकशीच्या सद्यःस्थितीचा अहवाल तीन जूनपर्यंत सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिला.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणाचे गांभीर्य ध्यानात घेता तीन जून रोजी न्यायालयाच्या सुटीकालीन खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

तीन जूनपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण करणे सीबीआयला अशक्‍य आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील मुलींच्या निवारागृहातील 11 मुलींचा खून झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

मृतदेह पुरलेल्या ठिकाणी सीबीआयला मानवी हाडे आढळून आल्याची माहिती ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी न्यायालयाला दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रिजेश ठाकूर याने सहकाऱ्यांच्या मदतीने 11 मुलांचा खून केला असल्याचा खळबळजनक दावा तीन मे रोजी सीबीआयकडून न्यायालयात करण्यात आला होता. या निवारागृहातील मुलींचा लैंगिक छळ करून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याची माहिती टाटा समाजविज्ञान संस्थेच्या (टीआयएसएस) अहवालातून पुढे आली होती. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT