देश

जगभरात Article 370 चा मुद्दा उपस्थित करणं बंद करा : रवीश कुमार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारताविरोधात भूमिका घेतली जात आहे. त्यानंतर आता याच मुद्यावरून भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावत जगभरात Article 370 चा मुद्दा उपस्थित करणे बंद करा, असे सांगितले. 

रवीश कुमार म्हणाले, जगासमोर भारताने स्वतःचा पक्ष ठेवला आहे. आम्ही जो निर्णय घेतला आहे, तो आमचा अंतर्गत विषय आहे. पाकिस्तान सैरभैर झाल्यामुळेच अशा प्रकारची पावले उचलत आहे. पाकिस्तानने हवाई हद्द बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे, असे जे काही निर्णय घेत आहे. त्याचा पुनर्विचार करण्याचा आम्ही सल्ला दिला आहे. 

दरम्यान, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा उपस्थित केला, तर तिथेसुद्धा आम्ही त्यांना उत्तर देऊ, असेही रवीश कुमार यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Deputy Chief Minister Ajit Pawar: राहुल गांधींच्या आरोपात तथ्य नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार; 'हरल्यावरच ईव्हीएमची आठवण येते, जिंकल्यावर नाही'

Latest Marathi News Updates : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राखचा खून करून संशयितांचे मिरजेकडे पलायन

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2025 : अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असतानाच वडिलांचं निधन, श्रीलंकेच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT