देश

जगभरात Article 370 चा मुद्दा उपस्थित करणं बंद करा : रवीश कुमार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारताविरोधात भूमिका घेतली जात आहे. त्यानंतर आता याच मुद्यावरून भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावत जगभरात Article 370 चा मुद्दा उपस्थित करणे बंद करा, असे सांगितले. 

रवीश कुमार म्हणाले, जगासमोर भारताने स्वतःचा पक्ष ठेवला आहे. आम्ही जो निर्णय घेतला आहे, तो आमचा अंतर्गत विषय आहे. पाकिस्तान सैरभैर झाल्यामुळेच अशा प्रकारची पावले उचलत आहे. पाकिस्तानने हवाई हद्द बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे, असे जे काही निर्णय घेत आहे. त्याचा पुनर्विचार करण्याचा आम्ही सल्ला दिला आहे. 

दरम्यान, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा उपस्थित केला, तर तिथेसुद्धा आम्ही त्यांना उत्तर देऊ, असेही रवीश कुमार यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT