गुवाहाटी - आसाममधील पुरस्थिती बिकट झाली असून राज्यातील अकरा जिल्ह्यांतील तब्बल तीन लाख लोकांना याचा जबर फटका बसला असून एकाचा मृत्यू झाल्याचे समजते. आसामच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या संदर्भात एक सविस्तर अहवाल तयार केला असून त्यात या आपत्तीची तीव्रता मांडण्यात आली आहे.
राज्यातील धेमाजी, लखीमपूर, नगाव, होजाई, दाररंग, बारपेटा, नलबारी, गोलपाडा, पश्चिम कर्बी अँग्लोन्ग, दिब्रुगढ आणि तिनसुखिया या जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसला आहे. एकट्या गोलपाडा जिल्ह्यात दोन लाखांपेक्षाही अधिक लोकांना याचा फटका बसला असून नलबारीमध्ये २२ हजार आणि नगावमध्ये ११ हजार लोकांना पुरामुळे विस्थापित व्हावे लागले आहे. निमलष्करी दलांनी मदत आणि बचाव कार्याला सुरवात केली असून स्थानिकांना भात, डाळ, मीठ, गोडतेल आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. सध्या जोरहाट जिल्ह्यात निमतीघाट भागात ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून अनेक भागांत पुराचे पाणी शिरले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुराचा फटका
३२१ - खेडी पाण्याखाली
२ हजार ६७८ हेक्टर - क्षेत्रावरील पिके नष्ट
५७ - बचाव छावण्या
१६ हजार ७२० - लोकांनी घेतला आश्रय
मालमत्तेचे नुकसान
पूल, रस्ते यांचे मोठे नुकसान
शाळा आणि घरे यांची पडझड
श्रमिक एक्सप्रेसचे आगमन थांबले
मुख्यमंत्री सोनोवाल यांनी
घेतला परिस्थितीचा आढावा
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांचे काम सुरू
काझीरंगातील प्राण्यांना वनविभागाकडून खाद्य पुरवठा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.