देश

कुमारस्वामी-सिद्धरामय्यांत िट्वटरवॉर

सकाळवृत्तसेवा

बंगळूर - युती सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते खरे नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेस व धजदचे नेते एकमेकाला शह देण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. 

मल्लिकार्जुन खर्गे यापूर्वीच मुख्यमंत्री व्हायला हवे होते. परंतु, ते राजकारणाचे बळी ठरल्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बुधवारी (ता. १५) म्हटले होते. त्यामुळे दुखावलेल्या सिध्दरामय्यांनी गुरुवारी (ता. १६) काँग्रेस व धजदमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अनेक लोक पात्र असून त्यात एच. डी. रेवण्णाही एक असल्याचे ट्‌विट करत प्रत्युत्तर दिले. 

युतीत आता शह-काटशहाच्या राजकारणाला जोर आला आहे. धजदचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ व सिध्दरामय्या यांच्यातील वाद शांत होतो न होतो तोच आता नवा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे राज्याच्या विकासात मोठे योगदान आहे. ते यापूर्वीच मुख्यमंत्री व्हायला हवे होते. मात्र, राजकीय परिस्थितीमुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद हुकल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केले होते. त्यांचे हे बोलणे खर्गे यांच्याशी सतत स्पर्धा करुन मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या सिध्दरामय्यांना चांगलेच झोंबले. त्यांनी लागलीच ट्विट करुन त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. कुमारस्वामींनी म्हटलेले खरे आहे.

मल्लिकार्जुन खर्गे केवळ मुख्यमंत्रीपदासाठीच नाही. तर त्यापेक्षा उच्च पदासाठी लायक आहेत. काँग्रेस व धजदमध्येही मुख्यमंत्रीपदासाठी अनेकजण पात्र आहेत. त्यात एच. डी. रेवण्णासुध्दा एक असून प्रत्येक गोष्टीसाठी वेळ यावी लागते, असे ट्‌विट करुन त्यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला.

रेवण्णांच्या नावाचा उल्लेख करुन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना डिवचण्याचाच त्यांचा उद्देश होता. त्याला कुमारस्वामीही ट्‌विट करुन प्रत्युत्तर दिले. तुमच्या वक्तव्याला राजकीय रंग देऊन गैरअर्थाने त्याचे विश्‍लेषण करणे योग्य ठरणार नाही. मल्लिकार्जुन खर्गे मुख्यमंत्री व्हायला हवे होते, हे माझे वक्तव्य काही दशकाच्या राजकीय वास्तवावर आधारित होते. त्यातून राजकीय लाभ घेण्याचा माझा उद्देश नाही. खर्गे हे पक्ष व जातीपलीकडचे महान व्यक्‍तिमत्त्व आहे. हे आम्ही विसरुन चालणार नाही, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे सिध्दरामय्यांना डिवचले आहे.

वाद नाही
सिद्धरामय्या यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना रेवण्णा यांनी सदिच्छांबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. मी व कुमारस्वामी प्रेमाने राहतो. आमच्यात कोणताच वाद नाही, सिद्धरामय्यांनी आपणास मुख्यमंत्रीपदास लायक असल्याचे मत व्यक्त केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सहानुभूतीपोटी त्यांनी मत व्यक्त केले असावे. पण, सध्या मुख्यमंत्रीपद रिक्त नसल्याने त्यावर चर्चा करणे योग्य ठरणार नाही, असा सल्लाही त्यांनी त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT