Agniveer Recruitment Sakal
देश

Agniveer Test : भरतीत अपयशी ठरलेल्या 23 वर्षीय युवकाची आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

Agniveer Test : केंद्रातर्फे काही दिवसांपूर्वी लष्करात भरती होण्यासाठी अग्नीवीर योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर या विरोधात देशभरात मोठा गदारोळ माजला होता. या सर्वामध्ये अनेकांनी यामध्ये भरती होण्यासाठी अर्जदेखील केले होते. त्यातील एका उमेदवाराने या भरती परीक्षेत अपयश आल्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमित कुमार असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव असून, हा युवक उत्तराखंड येथील पौरी गढवाल जिल्ह्यातील नौगाव कमंडा गावचा रहिवासी होता.

सुमित अग्निवीर भरती मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोटद्वारला गेला होता. पुढीलवर्षी तो या योजनेत भरती होण्यासाठी पात्र ठरणार नव्हता. यंदाची परीक्षेला बसण्याची ही त्याची शेवटची संधी होती. मात्र, त्यातही तो अपयशी झाला. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी अस्वस्थ झालेला सुमित घरी परतला होता. त्यानंतर त्याने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले आणि कोणाशीही काही बोलले नाही.

दुसऱ्या दिवशी त्याच्या कुटुंबीयांना सुमित त्याच्या खोलीच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सुमितच्या पालकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला, अशी माहिती सातपुलीचे उपजिल्हा दंडाधिकारी संदीप कुमार यांनी सांगितले.

अग्निपथ योजनेंतर्गत गढवाल रायफल्सने कोटद्वारमध्ये अग्निवीर सैन्य भरतीचे आयोजन केले आहे. 19 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान हा भरती मेळावा आयोजित करण्यात आला असून, गढवाल विभागातील सात जिल्ह्यांतील 63,000 हून अधिक इच्छुकांनी यासाठी नोंदणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT