देश

"मृतदेह जाळले जात आहेत अन् यांना रक्ताचा सुगंध येतोय"

नामदेव कुंभार

हैदराबाद : भारतामधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार असल्याची टीका एआयएमआयएम (ऑल इंडिया माजलीस-ए-इत्तेहदुल मुस्लिमीन)प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. देशात कोरोना महामारी आटोक्यात न येण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांची आहे. गतवर्षी लोकांना थाळी आणि टाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या. त्यामुळे कोरोना पळून गेला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थिीत केला.

देशातील रुग्णालयात आरोग्य सुविधा का वाढवल्या नाहीत? तेव्हा केंद्र सरकार झोपलं होतं का? राजधानी दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुडवडा का आहे? जर आपण आत्मनिर्भर आहोत, तर साऊदी अरब आणि रशीयासारख्या देशांकडून मद का घेतली जाते? , असे खासदार ओवेसी म्हणाले.

कोरोनामुळे मत्यू झालेल्यांना दफन केलं जात आहे, मृतदेह जाळले जात आहेत. आणि यांना (मोदी सरकारला) रक्ताची सुगंध येतोय. मोदी सरकार अदृश्य झालं आहे, असा हल्लाबोल ओवेसी यांनी केला आहे. जर आमच्याकडे खासदार निधी असता तर लोकांना ऑक्सिजन अथवा गोळ्या-औषधे दिली असती, पण आमच्याकडे सध्या काहीच नाही, असेही ओवेसी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Donation Scam नोकरीला लागताच वर्षभरात घेतली महागडी कार; गावी आलिशान घर अन् भावालाही पाठवले लाखो रुपये

FIFA WORLD CUP 2026: इंग्लंडच्या खेळाडूंना Viagra खाऊन खेळण्याची परवानगी; यजमान मेक्सिकोविरुद्धच्या लढतीपूर्वी का दिलीय ही सूट?

Latest Marathi Live Update: मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरही मुंबईतील अनेक मॅनहोल अद्याप उघडे

Maharashtra School Strike : पालकांनो नोंद घ्या! 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील 'या' शाळा राहणार बंद; शिक्षक समन्वय संघाचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

Smart Meter Maharashtra : स्मार्ट मीटरला भाजपच्या मंत्री आमदारांचाच विरोध, ग्रामीण भागात रोष वाढला; स्मार्ट मीटर बसवणे बंद होणार? ऊर्जा मंत्रीचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT