नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी sakal
देश

'केंद्रीय तपास संस्थांचे काम घाबरवण्याचं नाही तर ...'

सकाळ डिजिटल टीम

गेल्या ६-७ वर्षांत सातत्यानं केलेल्या प्रयत्नानंतर भ्रष्टाचार रोखणं शक्य आहे असा विश्वास देशात निर्माण करण्यात यश मिळाल्याचं मोदी म्हणाले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीबीआय आणि सीव्हीसीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. केंद्रीय तपास संस्थांचे काम कोणाला घाबरवणे नाही तर लोकांच्या मनातील भीती काढणे हे आहे असं मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, न्यायानेच सुराज्य शक्य आहे. यासाठी समाजातून भ्रषाचाराच्या अन्यायाला नष्ट करण्याची गरज आहे.

गेल्या ६-७ वर्षांत सातत्यानं केलेल्या प्रयत्नानंतर भ्रष्टाचार रोखणं शक्य आहे असा विश्वास देशात निर्माण करण्यात यश मिळाल्याचं मोदी म्हणाले. आज देशाला असा विश्वास आहे की, कोणत्याही देवघेवीशिवाय आणि मधल्या दलालांशिवाय सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो. भ्रष्टाचार लहान असो की मोठा तो कोणाचा तरी अधिकार हिरावून घेतो. देशाच्या सामान्य नागिरकाला त्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवतो. देशाच्या प्रगतीत यामुळे अडथळे येतात असंही मोदींनी म्हटलं.

मोदींनी म्हटलं की, आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. येत्या २५ वर्षात 'आत्मनिर्भर भारत' या विराट संकल्पाच्या दिशेने देश वाटचाल करत आङे. आज आम्ही गूड गव्हर्नंन्स - प्रो पीपल, प्रोअॅक्टिव्ह गव्हर्नन्सला आणखी भक्कम करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही मोदींनी सांगितलं.

मोदी म्हणाले की, भ्रष्टाचार हा व्यवस्थेचा भाग आहे हे मानण्यासाठी नवा भारत तयार नाही. पारदर्शक व्यवस्था नागरिकांना हवी आहे. आज २१ व्या शतकातील भारत हा आधुनिक विचारांसह तंत्रज्ञानाला मानवतेच्या हितासाठी वापरण्यास प्रोत्साहन देत आहे. न्यू इंडिया नवनिर्मिती करणारा असून पुढाकार घेऊन त्याची अंमलबजावणी करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : ‘पीओके’ भारताचेच, आम्ही ते घेऊ ;अमित शहा

आजचे राशिभविष्य - 17 मे 2024

Latest Marathi News Live Update : महायुतीची शिवाजी पार्कवर तर, इंडिया आघाडीची बीकेसी मैदानावर आज सांगता सभा

पुण्याचा चालता-बोलता इतिहास

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

SCROLL FOR NEXT