Chidambaram, Amit Shah 
देश

अमित शहा म्हणाले होते, मैं समंदर हूं, लौटकर जरूर आऊंगा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आयएनक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केल्यानंतर सर्वांना 2010 मध्ये सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांना अटक केल्याची आठवण झाली. त्यावेळी अमित शहा यांनी मै समंदर हूं, लौटकर जरुर आऊंगा हा म्हटलेला शेर आठवला.

केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) सरकार सत्तेवर असताना तत्कालीन भाजप नेते आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अटकेसाठी सीबीआयचे पथक गेले होते. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या कार्यकाळात पी. चिदंबरम यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रिपदाचा कार्यभार होता. त्यावेळी 25 जुलै 2010 रोजी चिदंबरम यांनी अमित शहा यांच्या अटकेसाठी सीबीआयला धाडले होते. शहा‌ चार दिवस बेपत्ता होते. त्यानंतर ते थेट भाजपच्या ब्रिफिंगला‌ ‌आले होते. त्यावेळी त्यांना अटक झाली होती. 

आज जवळपास 9 वर्षांनंतर हेच वास्तव समोर आले आहे. फक्त आता अमित शहा यांच्याजागी सध्या चिदंबरम आहेत तर चिदंबरम यांच्या जागी सत्तेवर अमित शहा आहेत. अमित शहा यांना त्यावेळी गुजरातमधून तडीपार करण्यात आले होते. तसेच त्यांना कारागृहातही राहावे लागले होते. आता चिदंबरम यांच्याबाबत न्यायालयात काय निर्णय होतो, ते पाहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EU takes action against IRGC : युरोपियन युनियनने ‘इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ला दहशतवादी संघटना केलं घोषित!

Arijit Singh Possible to enter in Politics : अरिजीत सिंह राजकारणात करतोय एन्ट्री? ; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ!

Ajit Pawar : दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अर्पण केली श्रद्धांजली, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठांत शुकशुकाट

Ajit Pawar :...ही दादांची सभा नव्हे दोस्ता, अखेरच्या निरोपाची वेळ आहे! विविध रंगछटा व हास्यमुद्रेतील दादांचे १२ फ्लेक्स पाहून कार्यकर्ते गहिवरले

T20 World Cup 2026 जिंकून सूर्यकुमारच्या नेतृ्त्वात टीम इंडिया इतिहास घडवणार? रवी शास्त्री म्हणाले, '१० मिनिटांचा खेळ...'

SCROLL FOR NEXT