crime 
देश

विंग कमांडरने अमित शहांच्या नावाने केला राज्यपालांना फोन, कशासाठी?

वृत्तसंस्था

भोपाळ : भारतीय हवाई दलातील विंग कमांडरने आपल्या मित्राला कुलगुरु बनविण्यासाठी राज्यपालांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने फोन केल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे.

मध्य प्रदेश पोलिसांनी या विंग कमांडरसह त्याच्या डॉक्टरला अटक केली आहे. विंग कमांडरने एका विश्वविद्यालयाचा कुलगुरू म्हणून आपल्या डॉक्टर मित्राची निवड करावी, यासाठी मध्य प्रदेशच्या राज्यपालांच्या निवासस्थानी अमित शहांच्या नावाने फोन केला. राज्यपाल निवासस्थानातील कर्मचाऱ्यांना या फोनमध्ये गडबड वाटली, तसेच अमित शहांकडून असे फोन येणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. या प्रकरणी मध्य प्रदेश एसटीएफने विंग कमांडर व त्याचा मित्र डॉ. चंद्रेश कुमार यांना अटक केली.

एसटीएफचे पोलिस अधिकारी अशोक अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश आयुर्विज्ञान विश्वविद्यालयाचा कुलगुरूची निवड होणार आहे. यासाठी डॉ. शुक्ला यांनी विंग कमांडर असलेल्या कुलदीप वाघेला यांना याबाबत माहिती दिली. तसेच कुलगुरू होण्यासाठी मोठ्या नावाची राज्यपालांकडे शिफारस करण्याची गरज असल्याचेही सांगितले. त्यानंतर वाघेला यांनी राज्यपालांना फोन करून शिफारस केली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

SCROLL FOR NEXT