मुदखेड (जि.नांदेड) - केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवानांवरच देशाच्या अंतर्गत सुरक्षेची मोठी जबाबदारी आहे. त्यांच्याशिवाय देशाची सुरक्षा अशक्य आहे, असे मत केंद्र गृहमंत्री अमित शहा यांनी केले. मुदखेड येथील सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये पिंपळाच्या रोपाची लागवड करून एक करोड वृक्ष लागवडचा टप्पा शुक्रवारी (ता.१७) पूर्ण केला. त्यावेळी ते जवानांसोबत संवाद साधतांना बोलत होते.
मुदखेड (जि.नांदेड) - केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवानांवरच देशाच्या अंतर्गत सुरक्षेची मोठी जबाबदारी आहे. त्यांच्याशिवाय देशाची सुरक्षा अशक्य आहे, असे मत केंद्र गृहमंत्री अमित शहा यांनी केले. मुदखेड येथील सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये पिंपळाच्या रोपाची लागवड करून एक करोड वृक्ष लागवडचा टप्पा शुक्रवारी (ता.१७) पूर्ण केला. त्यावेळी ते जवानांसोबत संवाद साधतांना बोलत होते.  
देश

देशाची अंतर्गत सुरक्षा सीआरपीएफ जवानांशिवाय अशक्य : अमित शहा

गंगाधर पोळ

मुदखेड (जि.नांदेड) - केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) (CRPF) जवानांवरच देशाच्या अंतर्गत सुरक्षेची मोठी जबाबदारी आहे. त्यांच्याशिवाय देशाची सुरक्षा अशक्य आहे, असे मत केंद्र गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah In Nanded) यांनी केले. मुदखेड येथील सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये पिंपळाच्या रोपाची लागवड करून एक करोड वृक्ष लागवडचा टप्पा शुक्रवारी (ता.१७) पूर्ण केला. त्यावेळी ते जवानांसोबत संवाद साधतांना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar), सीआरपीएफ महानिदेशक कुलदिपसिंह, जुल्फिकार हसन, रश्मी शुक्ला, एम. एस. भाटिया आदी उपस्थित होते. देशभरामध्ये सीआरपीएफ जवानांनी आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा व शहीद जवानांची शौर्यगाथा सीआरपीएफचे महानिदेशक कुलदीपसिंह यांनी प्रास्ताविकमधून मांडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, अंतर्गत असलेल्या महत्त्वाच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ मोठी जोखीम उचलत आहे.

देशाअंतर्गत सुरक्षा ही सीआरपीएफ जवानांशिवाय होऊ शकत नाही. या देशांमध्ये पर्यावरणचे संगोपन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी सीआरपीएफ जवानांकडून देशातील प्रत्येक सीआरपीएफच्या केंद्रांमध्ये एक कोटींपेक्षा जास्त वृक्ष लागवडीचा संकल्प आहे.हा संकल्प सीआरपीएफने माझ्या हाताने मुदखेड येथील केंद्रामध्ये पिंपळ या वृक्षाची लागवड करून केला आहे. पिंपळ, कडुलिंब व तुळस हे वृक्ष ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात देतात व या वृक्षांना आयुष्यमान जास्त असल्यामुळे सृष्टीचे संरक्षण देखील चांगल्या प्रकारे होत असते. त्यामुळे हे वृक्ष मोठ्या प्रमाणात लावली जाणार आहेत. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस व निजामशाहीतून मराठवाडा व तेलंगाना हे दोन विभाग आज मुक्त झाले व त्यांना स्वातंत्र्य मिळाले तो दिवस आजच आहे. हा दुग्धशर्करा योग असून या दिनानिमित्त मला छत्रपती शिवाजी महाराज व गुरुगोविंद सिंग यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या पुण्यभूमीमध्ये येता आले हे माझे भाग्य आहे, असेही ते म्हणाले. यावेळी सीआरपीएफचे महानिदेशक कुलदीप सिंह, राकेश कुमार यादव, एम. जे. विजय, प्रीत मोहन सिंह, महेश कुमार, शिवा राम कृष्णा, केंद्राचे प्राचार्य लीलाधर महारानिया, पुरुषोत्तम जोशी, एम. के. राठोड, पुरुषोत्तम राजगडकर आदी उपस्थित होते.

जवानांनी वृक्षाशी नाळ जोडावी

विकास करत असताना पर्यावरणाची हानी होऊ नये. तसेच पर्यावरणाचे संगोपन व्हावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वृक्ष लागवडीची संकल्पना आणली. तिला प्रत्यक्षात उतरवलीही आहे. भविष्यात ग्लोबल वॉर्मिंगचा उद्भवणारा मोठा धोका वृक्षलागवड आणि संगोपनातून टाळला जाऊ शकतो. सीआरपीएफच्या प्रत्येक जवानांनी वृक्षाशी आपली नाळ जोडावी. वृक्ष लागवडी सोबत त्या वृक्षाचे संगोपन आपल्या लेकराप्रमाणे करावे, असा संदेशही अमित शहा यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT