admission
admission sakal
एज्युकेशन जॉब्स

अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा लवकरच होणार जाहीर

मीनाक्षी गुरव

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना वेध लागले ते अकरावी प्रवेशाचे.

पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचा सूतोवाच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने केला आहे. त्यामुळे इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्यासाठी उत्सुक असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना वेध लागले ते अकरावी प्रवेशाचे. परंतु यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन पाच दिवस उलटले तरी अद्याप अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू न झालेली नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी-पालकांना पुढील प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा लागली आहे.

‘परंतु इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया ही राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी धरून राबविण्यात येते. तसेच ही प्रक्रिया नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेपर्यंत सुरू असते आणि प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात नव्याने नोंदणी करण्याची सुविधा विद्यार्थ्यांसाठी खुली असते. त्यामुळे अन्य मंडळाचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे,’ असे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्या सदस्य सचिव व विभागीय शिक्षण उपसंचालक मीना शेंडकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असला तरीही अद्याप केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), आयसीएसई अशा विविध शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागलेला नाही. म्हणूनच या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

‘शिक्षण विभागामार्फत इयत्ता अकरावीच्या प्रवेशाचे पुढील वेळापत्रकासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला बुधवारपर्यंत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच ऑनलाइन प्रवेश अर्ज भाग दोन आणि पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेस सुरवात होईल.’

- महेश पालकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक

महाविद्यालयांचे प्रमाणीकरण आवश्यक

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेतंर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील जवळपास ६२ कनिष्ठ महाविद्यालयांनी अद्याप आपले अर्ज लॉक केलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रमाणीकरण होऊ शकलेले नाही. या महाविद्यालयांची यादी प्रवेश समितीने संकेतस्थळावर अपलोड केली आहे. प्रमाणीकरण झाल्याशिवाय संबंधित महाविद्यालयांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवश्यक ते सर्व आदेश अपलोड करून बुधवारी (ता. २२) दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज अपलोड करावेत अन्यथा त्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही,’’ अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्य सचिव मीना शेंडकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT