Professor
Professor sakal
एज्युकेशन जॉब्स

राज्यात प्राध्यापक भरती रखडली

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील महाविद्यालयांमधील सुमारे ६० टक्क्यांहून अधिक कायमस्वरूपी प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. रखडलेल्या प्राध्यापक भरतीमुळे ही परिस्थिती अधिक गंभीर होत आहे.

पुणे - पाच वर्षांपूर्वी निवृत्त होणाऱ्या प्राध्यापकांची (Professor) संख्या लक्षात घेत २०१७ भरतीची (Recruitment) घोषणा करण्यात आली. कोरोना काळातील निर्बंधामुळे (Restriction) ही पदभरती लांबली. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये पदभरतीवरील निर्बंध शिथिल होताच संवर्गनिहाय आरक्षणाचा (Reservation) मसुदा विधिमंडळात मांडण्यात आला. दोन्ही सभागृहांत मंजूर झालेल्या या विधेयकावर राज्यपालांची गेल्या जानेवारीतच स्वाक्षरी झाली. मात्र, त्यानंतर या भरतीबाबत राज्य सरकारने अद्याप एकही पाऊल पुढे उचलले नाही.

राज्यातील महाविद्यालयांमधील सुमारे ६० टक्क्यांहून अधिक कायमस्वरूपी प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. रखडलेल्या प्राध्यापक भरतीमुळे ही परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. नंदकुमार उदार म्हणाले, ‘‘प्राध्यापक भरतीची घोषणा होऊन आता पाच वर्षांचा कालावधी उलटत आहे. राज्यपालांच्या मंजुरीनंतरही दोन महिने उलटून गेले. अजूनही आकृतिबंधाला मान्यता मिळालेली नाही. सरकारच्या या उदासीन कारभाराला कंटाळून ११ एप्रिलपासून आम्ही बेमुदत उपोषणाला बसणार आहोत.’’

राज्यशासन प्राध्यापक भरतीकडे काणाडोळा करत असून, शिक्षक आमदारही याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्यातील नवप्राध्यापक आता अटीतटीची लढाईला उतरले असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंबंधी उच्च व तंत्रशिक्षण विभागाशी संपर्क केले असता उत्तर मिळाले नाही.

विनाअट सर्व जागा भरा

सरकारने ऑक्टोबर २०१७ मध्ये निवृत्त होणाऱ्या प्राध्यापकांच्या ४० टक्के पदांची भरती घोषित केली आहे. पण मागील पाच वर्षांत या निवृत्त होणाऱ्या प्राध्यापकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशावेळी डिसेंबर २०२१ पर्यंतच्या सर्व निवृत्त प्राध्यापकांची भरती करावी, अशी मागणी नवप्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ्रीकर यांनी केली आहे.

आकडे बोलतात..

  • राज्यातील अनुदानित महाविद्यालये : ११७१

  • दरवर्षी निवृत्त होणाऱ्या प्राध्यापकांची संख्या - सरासरी ३,०००

  • २०२१ पर्यंत निवृत्त होणाऱ्या जागा (अंदाजे) - १५ ते १७ हजार

  • तासिका तत्त्वावरील (एकूण प्राध्यापकांच्या तुलनेत) - सुमारे ५० टक्के

भरतीची घोषणा करत सरकारने आमची फसवणूक केली आहे. २०२१ पर्यंतच्या सर्व जागा भरणार, असे आश्वासन देणाऱ्या सरकारकडून अजून पहिल्या घोषणेचे ‘रोस्टर’सुद्धा सुरू झालेले नाही. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे.

- डॉ. संदीप पाथ्रीकर, अध्यक्ष, नवप्राध्यापक संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT