वडापाव
वडापाव 
फूड

तुम्हाला-आम्हाला आवडणाऱ्या वडापावचा इतिहास

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - वडापाव सगळ्यांना आवडणारा. मग तो लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्व आवडीने खातात. मग हा मुंबई वडापाव (Mumbai Vadapav) आला कुठून ? बऱ्याच जणांना त्याचा इतिहास माहित नसतो. आम्ही तुम्हाला त्याविषयी सांगणार आहोत. तोंडाला पाणी आणणाऱ्या या वडापावचा शोध १९६० मध्ये अशोक वैद्य (Ashok Vaidya) यांनी लावला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेला दाक्षिणात्य लोकांप्रमाणे उडपी रेस्तराँ सुरु करुन उद्यमी बननण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाने प्रेरित झालेल्या वैद्य यांनी दादार रेल्वेस्थानकाच्या बाहेर (१९६६) वडा आणि पोहा स्टाॅल सुरु केला. त्याचबरोबर ऑम्लेट पाव ही विकायचे. एकेदिवशी त्यांनी वडा पावमध्ये टाकून त्यावर काही चटणी टाकली. यातून वडापाव कमी काळात लोकप्रिय खाद्यपदार्थ बनला. १९७० ते ८० दरम्यान अनेकदा संप झाले. त्यामुळे वस्त्रोद्योगाचे कारखाने बंद पडली. परिणामी अनेक बेकार झालेल्या कामगारांनी वडापाव स्टाॅल्स सुरु केले. याला शिवसेनेने प्रोत्साहन दिले. कामाला जाणाऱ्या वर्गाचे स्नॅक म्हणून वडापावची ओळख निर्माण झाली. स्वस्त आणि खाण्यास सोयस्कर. यामुळे लोकांमध्ये वडापावची लोकप्रियता वाढली.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे देखील वैद्य यांच्या वडापावचे नियमित ग्राहक होते. यातून दोघांची मैत्री झाली. ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वैद्यांना त्रास न देण्याचे बजावले होते. १९९० मध्ये अमेरिकन फास्ट फूड चेन मॅक्डाॅनल्ड भारतात आली आणि मोठ्या प्रमाणावर त्याचा विस्तार झाला. पण त्याचा महाराष्ट्रातील वडापाववर काही परिणाम झाला नाही. कारण मॅक्डाॅनल्डचे बर्गर हे प्रमाणित रेसिपी होती. त्यासाठी वेगवेगळ्या सामुग्री वापरल्या जात. यामुळे सर्व बर्गरची सारखीच चव लागायची. मात्र वडापाव बाबत अस काही नव्हतं. बहुतेक विक्रेत्यांचे म्हणणे की त्यांची वडापाव रेसिप इतरांपेक्षा वेगळी असते. भारतातील विविधतेचा तो परिणाम आहे. वर्ष २००० मध्ये मुंबई येथील उद्योगपती धीरज गुप्ता आर्थिक संधी पाहत वडापाव चेन जम्बोकिंग सुरु केले. त्याची भारतीय बर्गर म्हणून त्यांनी जहिरात केली. अल्पवधी काळात मुंबईत ७५ दुकाने गुप्ता यांनी सुरु केले. यातून दररोज ५०० वडापाव विकले जात होते. आजच्या घडीला भारतात वेगवेगळ्या वडापाव चेन सुरु झाले आहेत. मात्र मुंबईकरांचे रस्त्यावरील वडापाव वरचे प्रेम कमी झालेले नाही. २०१५ मध्ये, दिग्दर्शक अलमबयान सिद्धार्थ यांनी पाच मिनिटांचा वडापाव इंक नावाचा लघुपट बनवला.

मुंबई वडापाव

यात वडापावचे निर्माता अशोक वैद्य यांचा जीवन प्रवासावर प्रकाश टाकला आहे. तसेच दरवर्षी २३ ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राने खवय्यांना ती भेट दिली आहे. ६ जुलै १९९८ रोजी अशोक वैद्य यांचे वयाच्या ५८ वर्षी निधन झाले. त्यांच्या वडापावमुळे महाराष्ट्र आणखीजवळ आला. चित्रपटातील तारेतारकांपासून क्रिकेटपटू, उद्योगपतींपासून ते कामगार हे सर्व वडापावचे चाहते बनले आहे. वैद्य यांच्यानंतर त्यांचा मुलगा नरेंद्र यांनी त्यांच्या वडिलांची परंपरा पुढे चालू ठेवली आहे. त्यांना फॅशन डिझायनर व्हायचे होते. त्यांच्याकडे वाणिज्य शाखेची पदवी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT