ganesh-festival

गणेशोत्सवावर प्रशासनाची नजर! 

सकाळवृत्तसेवा

सातारा- उत्साह आणि मांगल्याचे प्रतीक असलेला गणेशोत्सव अवघा काही तासांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवावर अन्न आणि औषध प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळही जलप्रदूषणाच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रमुख 16 ठिकाणी जलप्रदूषणाच्या निमित्ताने होणारे बदल टिपणार आहे. 

गणेशोत्सवात गोड पदार्थांची रेलचेल असते. गौरी पूजन व जेवणाच्या निमित्ताने बर्फी व अन्य फराळाच्या पदार्थांचा वापर केला जातो. या सणाच्या निमित्ताने अनुचित प्रकार टाळण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कंबर कसली आहे. नुकतीच साताऱ्यातील हलवाईंची बैठक घेऊन भेसळयुक्त पदार्थांना प्रतिबंध करण्यासंदर्भात तसेच स्वच्छतेसंदर्भात सूचना केल्या आहेत. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात चार ठिकाणी मिठाई व्यावसायिकांवर छापे टाकण्यात आले. खाद्यपदार्थ आस्थापनांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त एस. बी. कोडगिरे यांनी सांगितले. 

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 16 विसर्जनस्थळांवर लक्ष ठेवणार आहे. या ठिकाणी विसर्जनपूर्व, विसर्जनाच्या काळात आणि विसर्जनानंतरचे पाण्याचे नमुने घेऊन त्यांचे पृथःकरण करण्यात येईल. सातारा शहरात मंगळवार तळ्यासह पाच विसर्जनस्थळांचे नमुने घेण्यात येतील. कृष्णा नदीवर वाई, माहुली आणि कऱ्हाड अशा तीन ठिकाणी पाणी तपासले जाणार असल्याचे मंडळाचे प्रांताधिकारी बाबासाहेब कुकडे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील पालिका क्षेत्रांमध्ये मूर्ती विसर्जनासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्याबाबतही सूचित करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
 
मिठाई विक्रेत्यांनी बाहेरचा खवा खरेदी करताना त्याचा उत्पादन दिनांक आदी गोष्टी तपासून घ्याव्यात अथवा स्वत: तयार केलेल्या खव्याचाच वापर करावा. 
- एस. बी. कोडगिरे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Collection: जीएसटीने रचला इतिहास! पहिल्यांदाच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे; सरकार मालामाल

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

Bahubali: Crown Of Blood : "बाहुबली परत येतोय" ; एसएस राजामौली यांनी केली नव्या सिरीजची घोषणा

T20 World Cup 2024 All Teams Squad : भारत, पाकिस्तान, इंग्लंडसह सर्व 20 संघांचा 'स्क्वाड'! जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT