narendra modi and donald trump.jpg 
ग्लोबल

अमेरिकेचा मैत्रीचा दावा खोटा? भारताची पाकिस्तान, सीरियासोबत केली तुलना

सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- भारतासोबत मैत्रीचा दावा करणाऱ्या अमेरिकेने आपल्या नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला दिला आहे. भारतातील वाढणारे कोरोनाचे संकट, गुन्हेगारी आणि दहशतवाद असे कारण यामागे सांगितलं आहे. एवढेच नाही तर अमेरिकेने भारत प्रवासासाठी 4 रेटिंग निश्चित केली आहे. रेटिंग 4 ला सर्वात वाईट मानलं जातं. या श्रेणीमध्ये भारताशिवाय युद्धग्रस्त सीरिया, दहशतवादाचे केंद्र असलेला पाकिस्तान, इराण, इराक आणि यमन या देशांचा समावेश होतो. 

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याशिवाय भारतात गुन्हेगारी आणि दहशतवाद फौफावला आहे. त्यामुळे अमेरिकी नागरिकांनी भारताची यात्रा करु नये, असं अमेरिकी सरकारने सांगितलं आहे. अमेरिकेने जाहीर केलेल्या आपल्या सूचनांमध्ये महिलांविरोधात वाढणारे गुन्हे आणि कट्टरतावाद याचांही उल्लेख केला आहे. दुसरीकडे, इंडियन टूरिझम अँड हॉस्पिटॅलीटी संघटनेने (FAITH) भारत सरकारला याप्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलं आहे. भारत सरकारने अमेरिकी सरकारवर ट्रॅव्हल अॅडव्हायझरी बदलण्यासाठी दबाव आणावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

रशियाच्या व्हॅक्सिनसाठी भारताची तयारी? वाचा आरोग्य मंत्रालय काय म्हणते 

संघटनेनं म्हटलं की, भारत सरकारने याला प्राथमिकतेने घेऊन या मुद्दाला उचलले पाहिजे, कारण यामुळे आपल्या देशाची नकारात्मक प्रतिमा बनत आहे. पर्यटन क्षेत्र कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे गंभीर संकटातून जात आहे. असे असले तरी भारत सरकार पर्यटन क्षेत्र सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेने 23 ऑगस्ट रोजी ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जाहीर केल्या होत्या. यात भारताशिवाय सीरिया, यमन, इराण आणि इराक अशा हिंसा प्रभावित देशांचा समावेश केला आहे. 

भारत-पाकिस्तान सीमेवर न जाण्याचा दिला इशारा

भारताच्या पर्यटन क्षेत्रासाठी अमेरिकी पर्यटक महत्वाचे आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेतून येणारे पर्यटक अन्य देशांच्या तुलनेत अधिक काळ भारतात राहतात. अमेरिकी पर्यटक सरासरी  29 भारतात राहतात, तर अन्य देशाचे पर्यटक सरासरी 22 दिवस येथे राहतात. त्यामुळे भारत सरकारने अमेरिकी सरकारवर दबाव आणावा, त्यामुळे पर्यटन क्षेत्राला चालणा मिळेल, असं फेथने म्हटलं आहे.  

भारतात कोरोना का वाढतोय? ICMR ने सांगितलं कारण

अमेरिकेने आपल्या ट्रॅव्हल अॅडव्हायझरीमध्ये इशारा दिला आहे की, कोरोना महामारीमुळे देशाच्या सीमा केव्हाही बंद होऊ शकतात. त्यामुळे प्रवासावर निर्बंध येतील. पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो. अमेरिकेने विशेष करुन जम्मू-काश्मीर आणि भारत-पाकिस्तान सीमेवर न जाण्याची चेतावणी दिली आहे. भारताला पाकिस्तान आणि सीरियाच्या श्रेणीत टाकणे वाईट असल्याचं फेथने म्हटलं आहे. 

(edited by- kartik pujari)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

SCROLL FOR NEXT