आक्रा (घाना) : भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी अहिंसेचा मंत्र देत देशाला स्वातंत्र्याची पहाट दाखविणारे व शांततेचा पुरस्कार करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा घाना विद्यापीठातील पुतळा हटविण्यात आला आहे. गांधीजी कृष्णवर्णीयांबाबत वर्णद्वेष करीत होते, अशा तक्रारी विद्यार्थी व प्राध्यापकांनी केल्याने पुतळा हटविल्याचे सांगण्यात आले.
जागतिक शांततेचे दूत म्हणून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते घाना विद्यापीठात दोन वर्षांपूर्वी वाजतगाजत झाले होते. हा पुतळा म्हणजे घाना आणि भारत या देशांमधील सहकार्याचे प्रतीक होता. मात्र येथील प्राध्यापकांनी तो हटविण्यासाठी याचिका दाखल केली होती. यासाठी त्यांनी आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांपेक्षा भारतीय निश्चितच श्रेष्ठ आहे, असे वक्तव्य गांधी यांनी केले होते, असा दाखला दिला. या मुद्यावरून ऑनलाइन निषेध मोहीमही सुरू करण्यात आली होती. या दबाबामुळे दोन दिवसांत पुतळा हटविण्यात आल्याचे विद्यार्थी व प्राध्यापकांनी सांगितले.
"महात्मा गांधी यांचा पुतळा हटविणे हा आत्मसन्माचा मुद्दा होता,' अशी प्रातिक्रिया भाषा, साहित्य व नाट्य विभागाचे प्रमुख ओबाडेल कॅम्बोन यांनी व्यक्त केली. या प्रकरणावर भाष्य करण्यास विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला.
घानाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने ""हा विद्यापीठाचा अंतर्गत निर्णय आहे,'' असे सांगितले. या बाबीवरून भारत व घानामधील मैत्रीत बाधा येण्याची शक्यता असून, वाद टाळण्यासाठी पुतळ्याचे दुसऱ्या ठिकाणी स्थापना करावी, अशी अपेक्षा घानातील पूर्वीच्या सरकारने केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.