india modi 
ग्लोबल

भारताचा ‘जीडीपी’ आणखी घसरण्याची शक्यता; जागतिक बँकेचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन - चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर (जीडीपी) ९.२ टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज जागतिक बँकेने गुरुवारी वर्तविला. जूनमध्ये विकास दर ३.२ टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तविला होता, परंतु नंतर तो आणखी खाली येण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. ‘कोविड-१९’मुळे दीर्घकाळ लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे हा विकास दर घटणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारताची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाईट झाली आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे कंपन्या आणि नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यासह, साथीच्या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी देशभर लादलेल्या लॉकडाउनचाही विपरीत परिणाम झाला आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) वार्षिक बैठकीपूर्वी जागतिक बँकेने नुकत्याच झालेल्या साउथ एशिया इकॉनॉमिक फोकस पॉइंट अहवालात हा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२१-२२ मध्ये देशाचा ‘जीडीपी’ ५.४ टक्क्यांनी वाढेल, असेही या अहवालात म्हटले आहे.

वित्तीय तूट १२ टक्क्यांपेक्षा जास्त
जागतिक बँकेने म्हटले आहे, की राज्य सरकारांची एकूण वित्तीय तूट ४.५ ते ५ टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल, तरीही एकूण तूट (केंद्र व राज्य सरकारची मिळून) चालू आर्थिक वर्षात १२ टक्क्यांहून अधिक असेल. येणाऱ्या काळात हळूहळू यात सुधारणा होईल.

थकित कर्जे वाढतील
धोरणात्मक उपायांमुळे बाजारपेठेतील हालचाल सुरू झाली आहे, परंतु मागणी कमी झाल्याने कर्जाची थकबाकी वाढू शकते आणि नागरिक जोखीम घेण्याचे टाळू शकतात. रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या विश्लेषणामध्ये असे म्हटले आहे, की मार्च २०२१ पर्यंत नोंदणीकृत बॅंकांचे एकूण ‘नॉन-परफॉर्मिंग लोन-टू-ॲसेट रेशो’ १२.५ टक्क्यांपर्यंत वाढू शकेल. मार्च २०२० मध्ये तो ८.५ टक्के होता. मागील साडेसात वर्षांच्या कालावधीत केंद्र आणि राज्य सरकारच्या थकित कर्जात सर्वाधिक वाढ झाली असून, जूनच्या तिमाहीत थकबाकी १४.३ टक्क्यांनी वाढली, तर बिगर-वित्तीय थकीत कर्जात ९.१ टक्क्यांनी वाढ झाली.

लॉकडाउनमुळे ७० टक्के उपक्रम ठप्प
लॉकडाउनमुळे जवळपास ७० टक्के आर्थिक, गुंतवणूक, निर्यात आणि व्यवहार ठप्प झाले होते. या वेळी केवळ शेती, खाणकाम, आवश्‍यक सेवा, आर्थिक (निवडक), आयटी सेवा आणि सार्वजनिक सेवा यासारख्या जीवनावश्यक वस्तू आणि सेवा चालविण्यास परवानगी होती. जागतिक बँकेने म्हटले आहे, की गरीब कुटुंबांना आणि कंपन्यांना सरकारने पाठिंबा दिल्यानंतर गरिबीचा दर कमी होण्याची गती कमी झाली असली तरी थांबलेली नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT