ग्लोबल

'300 लोकांना मारलं तर कुठंय त्यांचं रक्त?' (व्हिडिओ)

वृत्तसंस्था

लखनौ- भारताने हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहे. पाकिस्तानी सेनेच्या मीडिया विंग इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन(ISPR) कडून मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये हल्ल्यात कोणीही दगावलं नसल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणण्यात आलं आहे की, 'भारतीय वायुसेनेनं असा दावा केला आहे की, तब्बल 300 दहशतवादी मारले गेले. जर या हवाई हल्ल्यामध्ये 10 जण जरी मारले गेले असते तर तिथे त्यांचं रक्त नसतं का दिसलं? कोणावर अंत्यसंस्कार नसते का झाले? याची जर कोणाला खात्री करायची असेल तर त्यांचीसाठी घटनास्थळी खुलं आहे.' असंदेखील या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे.


आयएसपीआरचे डीजी पुढे म्हणाले की, 'भारत हल्ला करू शकत नाही. भारत फक्त चकमकी करू शकतं. तुम्ही आम्हाला कधीच इजा पोहचवू शकत नाही. आम्हीच तुम्हाला धक्का देऊ शकतो.' तसेच भारतातील मिडिया हे खोट्या बातम्या पसरवत असल्याचेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे. भारतातील टीव्ही मिडियाचा हवालाही येथे देण्यात आला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

Water Storage : राज्यात केवळ २५ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT