who.jpg 
ग्लोबल

कोविड लस येईपर्यंत किती लोकांचा बळी जाईल? WHOने सांगितला भीतीदायक आकडा

सकाळन्यूजनेटवर्क

जिनिव्हा- कोरोना व्हायरसची भीती सर्व जगभरात असून बाधित आणि मृतांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. हा आकडा २० लाखांपर्यंत पोचू शकेल, असा इशारा जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. कोरोनावर प्रभावी लस येण्यापूर्वी आणि व्यापक पातळीवर लोकांना लस देण्याआधी या साथीत बळी पडलेल्यांची संख्या २० लाखांपर्यंत पोचण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या जागतिक साथीला संघटित होऊन पावले उचलली नाहीत तर मृतांची संख्या २० लाखांपेक्षा जास्त होऊ शकते, असे ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनाबाधितांची संख्या साडे तीन कोटीच्या घरात आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या आपत्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. माईक रायन म्हणाले की, या साथीच्या सावटातून आपण अद्याप किंचितही बाहेर पडलेलो नाही. कोरोनाचा संसर्ग वाढण्यास युवा पिढीला दोष देता कामा नये. कोरोना प्रसारासाठी आपण एकमेकांकडे बोट दाखवणार नाही, अशी मला अपेक्षा आहे. घरांमध्ये आयोजित केलेल्या मेजवानींमुळेही संक्रमण वाढत असून त्यात सर्व वयोगटांतील व्यक्ती सहभागी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाचं करण जोहर कनेक्शन? धर्मा प्रोडक्शनच्या एकास अटक

डॉ. रायन म्हणाले...
- कोरोना विषाणूंचा प्रसार सुरू झाल्यापासून नऊ महिन्यांतील मृत्यूसंख्या सुमारे नऊ लाखांपेक्षा जास्त.
- कोरोनामुळे अमेरिकेत दोन लाखांपेक्षा अधिक मृत्यू.
- भारतात ९० हजार, ब्राझीलमध्ये दीड लाख तर रशियात २० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू.
- बाधित रुग्णसंख्येत अमेरिका पहिल्या स्थानावर तर दुसऱ्या स्थानावर भारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

SCROLL FOR NEXT