गेल्या काही काळात नागरिकांचा कल आयुर्वेदिक उपचारांकडे अधिक वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक समस्येवर लोक आयुर्वेदिक उपचार घेत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच सध्या पंचकर्म panchakarma ही चिकित्सा अनेकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. परंतु. पंचकर्म म्हणजे केवळ तेल मालिश असा एक गैरसमज सर्वप्रचलित झाला आहे. म्हणूनच, पंचकर्म म्हणजे नेमकं काय किंवा या चिकित्सेमध्ये नेमकं काय केलं जातं ते पाहुयात. (keep-your-body-and-mind-healthy-with-panchakarma)
पंचकर्म म्हणजे काय?
पंचकर्म हा शब्द पंच (पाच) + कर्म (क्रिया) या दोन शब्दांनी तयार झाला आहे. पंचकर्म ही पाच चरणांची प्रक्रिया आहे. दुषित वातावरण आणि चुकीची खाद्यसंस्कृती यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे अनेकदा शरीरात विषारी वायू किंवा अन्य समस्या निर्माण होतात. या समस्या पंचकर्माच्या माध्यमातून दूर केल्या जातात. याच प्रक्रियेला डीटॉक्सीफिकेशन म्हटलं जातं. यामुळे शरीर निरोगी राखण्यासाठी नैसर्गिक शारीरिक क्षमता पुनर्संचयित करण्यास मदत होते. यात 5 मुख्य उपचारांचा समावेश आहे.
पंचकर्ममध्ये केल्या जाणाऱ्या उपचार पद्धती -
१. वमन -
चिकित्सेद्वारे उलटी करविणे. यामध्ये श्वसन मार्गाचा भाग, वरील गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक जठरापर्यंत स्वच्छ केला जातो. दमा, सोरायसिस सारख्या विकारांवर उपचार करण्यास मदत होते.
२. विरेचन-
चिकित्सेद्वारे कोठा साफ करणे, या प्रक्रियेद्वारे जठारापासून उत्सर्जन संस्थेपर्यंत भागाच्या उपचारांद्वारे शुद्धीकरण केले जाते. जठराची सूज, अॅसिड ओहोटी, हार्मोनल विकारांसारख्या विकारांवर उपचार करण्यास मदत करते.
३. नस्यम –
नाकाद्वारे औषधे सोडून पॅरा मजल (अनुनासिक) सायन्सेस तसेच श्वसन मार्गावरील भाग स्वच्छ केला जातो. सायनुसायटिस, मायग्रेन, सामान्य सर्दी सारख्या विकारांवर उपचार करण्यास मदत करते.
४. अनुवासन -
गुदाशय क्षेत्रामधून लिपिड कचरा साफ करण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. अनवासन केल्यामुळे पाठदुखी, पाय दुखणे, झोपेच्या विकारांसारख्या विकारांवर उपचार करण्यास मदत होते.
५. अस्थापन -
मोठे आतडे साफ करण्यासाठी काढ्याचा वापर केला जातो. याद्वारे बद्धकोष्ठता, संधिवात, ऑस्टिओपोरोसिस सारख्या विकारांवर उपचार केला जातो .
एखाद्या व्यक्तीचे वय, प्रकृती, पाचन क्षमता, तसेच दोषांमधील बिघाड (असंतुलन) यांचा विचार करून सायकतीची गरज लक्षात घेऊन व्यक्तिसापेक्ष उपचार केले जातात. प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी या चिकित्सा ऋतुमानानुसार घेण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदामध्ये बहुतेक आजार हे योग्यवेळी केलेल्या डिटॉक्सिफेकेशन चिकित्सेद्वारे ( दूषित पदार्थ शरीराबाहेर टाकणे ) होण्यापूर्वीच रोखले जाते. चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा , हार्मोनल विकृती इत्यादि आजारांपासून वेळोवेळी केलेल्या पंचकर्म उपचारांद्वारे स्वतः: ला दूर ठेवू शकता.
(लेखक डॉ. लिप्सा शाह (एमडी, आयुर्वेद), या मुंबईतील सैफी हॉस्पिटलमध्ये पूरक आणि पर्यायी औषध विभागात आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.