Sadguru Sakal
health-fitness-wellness

इनर इंजिनिअरिंग : देवाबद्दलचे निष्कर्ष काढून टाका

देवाचा प्रश्न येतो, तेव्हा तुम्हाला विश्वास ठेवायला सांगितलं गेलं आहे; तुम्हाला कोणीही देवत्व शोधण्यास सांगितलं नाही.

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

देवाचा प्रश्न येतो, तेव्हा तुम्हाला विश्वास ठेवायला सांगितलं गेलं आहे; तुम्हाला कोणीही देवत्व शोधण्यास सांगितलं नाही.

देवाचा प्रश्न येतो, तेव्हा तुम्हाला विश्वास ठेवायला सांगितलं गेलं आहे; तुम्हाला कोणीही देवत्व शोधण्यास सांगितलं नाही. अनुभव घेतल्याशिवाय, एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवल्याने, ती तुमचं परिवर्तन करू शकणार नाही. समजा तुमचा जन्म झाला त्या दिवसापासून मी तुम्हाला माझी करंगळी देव आहे, असं सांगत राहिलो आणि मग मी माझी करंगळी तुम्हाला दाखवली तर तुमच्यामध्ये दैवी भावना जागृत होतील. माझी करंगळी सैतान आहे, असं मी तुम्हाला शिकवलं, आणि मी तुम्हाला माझी करंगळी दाखवल्यास तुमच्यामध्ये अत्यंत भीती निर्माण होईल. हेच तुमच्या मनाचं स्वरूप आहे.

तुम्ही मनाच्या साह्याने जे काही करता त्याला खरं महत्त्व नाही. ते साधन म्हणून ठीक आहे, परंतु अंतिम सत्याच्या दृष्टीने त्याला काही अर्थ नाही. कारण ते आज एक आकार घेईल तर उद्या दुसरा. मन तरल आहे, त्याचा वापर करून तुम्ही काहीही बनवू शकता. त्याचा आकार कसा आहे हे केवळ त्याच्यावर कशाचा प्रभाव आहे यावर अवलंबून असतं. तुम्ही खोलवर पाहिलं तर ज्याला तुम्ही ‘तुमचं मन’, म्हणता ते तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या हजारो लोकांकडून उसनं घेतलेलं आहे. तुमचं मन ही तुमची केवळ पार्श्वभूमी आहे - तुम्ही कोणत्या कुटुंबातून आला, तुमचं शिक्षण, धर्म, तुम्ही कोणत्या देशाचे किंवा समाजाचे आहात आणि तुम्ही कोणत्या जगात राहत आहात यावर ते अवलंबून आहे.

बुद्धी हे फक्त जिवंत राहण्याचे साधन आहे, तुमच्या जीवनाचा एक मर्यादित पैलू. जिवंत राहणं आवश्यक आहे, परंतु त्याने तुम्ही परिपूर्ण होत नाही. जर तुम्हाला जीवनाच्या खोल आयामात शिरायचं असेल तर प्रथम तुमच्याकडे आवश्यक साधनं पाहिजेत. सध्या तुम्ही फक्त इंद्रियांच्या साहाय्यानं जीवन अनुभवता - पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, चव घेणे आणि वास घेणे. यांच्या साहाय्यानं तुम्हाला भौतिकतेच्या पलीकडे काय आहे ते कळू शकणार नाही. फूटपट्टी वापरून तुम्ही समुद्राची खोली मोजू शकणार नाही. लोकांच्या बाबतीत तेच होत आहे. ते आवश्यक साधनांशिवाय जीवनाच्या सखोल आयामापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहेत. म्हणून ते चुकीच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतात.

लोक निष्कर्षापर्यंत पोहचण्यासाठी आतुर असतात, कारण निष्कर्षाशिवाय त्यांच्याकडे स्वतःचं असं काही नसतं. तुम्ही ज्याला ‘मी’ म्हणून संबोधता, ती व्यक्ती किंवा ते व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ जीवनाविषयीच्या तुमच्या निष्कर्षांचं एक गाठोडं आहे. पण, तुम्ही जे काही निष्कर्ष काढले आहेत, ते चुकीचेच ठरतील कारण तुम्ही काढलेल्या कोणत्याही निष्कर्षात आयुष्य बसत नाही. ज्या क्षणी तुम्ही निष्कर्ष काढता, तुम्ही तुमचा विकास थांबवला आहे; तुम्ही थांबला आहात आणि जीवनातील संधी नष्ट केल्या आहेत.

आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे आणखी नव्या निष्कर्षांमध्ये उडी घेणं नाही. जेव्हा तुम्ही कोणतेही निष्कर्ष न काढता जगण्याचं धाडस दाखवाल, वास्तवाकडे सदैव नव्याने पाहण्यासाठी तयार असाल, या अस्तित्वाचा एक छोटासा कण म्हणून इथं राहण्यास तयार असाल, तेव्हाच तुम्ही या अस्तित्वाचे असीमित स्वरूप जाणू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT