भिवंडीत मनसेचे खळखट्याक आंदोलन, मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला
भिवंडी : भिवंडी ठाणे महामार्गावरील कशेळी ते अंजूर् फाटा हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावर जागो जागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दररोज या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक व अपघाता सारखे प्रकार होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनीच्या चालकांनी तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदन देऊन रस्ता दुरुस्ती ची मागणी केली होती.
मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने गेल्या महिन्यात आंदोलन केले होते, तरीसुद्धा संबंधित बांधकाम विभाग अधिकारी व टोल कंपनीधारकाने मनसेच्या मागणी कडे सराईतपणे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी अचानकपणे या टोल नाक्यावर हल्लाबोल आंदोलन करीत टोल नाक्यावरील कँबीन ची काचा फोडून तोडफोड करून आपला जाहीर निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी करीत आंदोलन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष डी.के.म्हात्रे यांच्या आदेशानुसार मनसेचे वाहतूक विभाग तालुका अध्यक्ष संतोष म्हात्रे,सचिव संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून भिवंडी - ठाणे या महामार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे ग्रामस्थ व या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नोकरदार,नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.याच महामार्गावरून मेट्रो रेल्वे जाणार असल्याने त्याचे काम सुरू आहे,त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे.तसेच रस्ता खराब झाला असताना सुद्धा टोलवसुली चे काम सुरू आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनांना विशेष करून रात्रीवेळी मोटर सायकलस्वारांचा गाडीला अपघात होत आहेत, अनेक गाड्या खड्ड्यांमध्ये आपटून बंद पडत होत्या, या गंभीर प्रकारामुळे वाहतूक कोंडीचा गहन प्रश्न दररोज निर्माण होत आहे. या महामार्गावर उभारण्यात आलेल्या टोलनाका कंपनीने हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गेल्या महिन्यात निवेदन देऊन मागणी केली होती. मात्र त्याकडे टोल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सराईतपणे दुर्लक्ष केल्यामुळे येथील ग्रामस्थ तीव्र नाराज झाले होते गणेश उत्सवाच्या काळात गणपतीच्या मुर्त्या खड्ड्यातून आणताना मोठा त्रास सहन करावा लागत होता अखेर विसर्जन शांततेत संपन्न होताच, आज सकाळी अचानकपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कशेळी टोल नाक्यावर धाव घेऊन हल्ला बोल आंदोलन करत टोलनाक्यावरील केबीनच्या काच फोडून आपला निषेध व्यक्त केला, या घटनेची माहिती नारपोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष म्हात्रे संजय पाटील यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.पोलीस आता या टोल नाक्यावर विशेष पोलीस बंदोबस्त साईनाथ केला आहे अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे करीत आहे.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.