ईशान्य भारतातील सर्व राज्ये पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय सुंदर ठिकाणं आहेत. ज्यांचं नैसर्गिक सौंदर्य सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडतं.
डमरु तलाव : डमरु सरोवर हे त्रिपुराची राजधानी आगरतलापासून 120 किमी अंतरावर असलेल्या अमरपूर विभागात आहे.या सरोवराचा आकार डमरूसारखा असल्याने या तलावाला भगवान शंकराच्या डमरूचे नाव देण्यात आलेय.हा तलाव सुमारे 41 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेला असून या तलावाचे सौंदर्य अतुलनीय आहे.डमरु तलाव पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. हे ठिकाण राइमा आणि साइमा या दोन नद्यांचा संगम आहे.हा तलाव सुंदर टेकड्यांनी वेढलेला असून चारही बाजूंनी हिरवीगार निसर्ग आहे. या सरोवरात एकूण 48 छोटी बेटे आहेत.गुमती नदी सरोवराजवळून उगम पावते, जी अनेक जिल्ह्यातून जाऊन बांगलादेशातील मेघना नदीला मिळते.या ठिकाणी एक जलविद्युत प्रकल्प देखील आहे, जो 'गुमती जलविद्युत प्रकल्प' म्हणून ओळखला जातो.गुमती वन्यजीव अभयारण्य देखील तलावाजवळच आहे, जिथं आपण अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहू शकता.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.