कोल्हापूर : प्रदूषणाच्या (Pollution) विळख्यात पंचगंगेचा गुदमरणारा श्वास मोकळा करण्यासाठी ‘पुन्हा साथ देऊया... चला, पंचगंगा वाचवूया’ या मोहिमेंतर्गत राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीने पंचगंगा प्रदूषणमुक्तीला प्रारंभ झाला. समाजातील विविध संस्था, संघटनांबरोबरच शासनाची सर्व यंत्रणाही यात सहभागी झाल्या आहेत.
पंचगंगेचा गुदमरणारा श्वास मोकळा करण्यासाठी पंचगंगा घाटावर स्वच्छता मोहीम व जलसंवर्धन प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. हजारो कोल्हापूरकर यानिमित्ताने उद्या (ता.२२) एकत्र येऊन पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा वज्रनिर्धार करणार आहेत. याची तयारी करण्यात आली असून पंचगंगा घाटावर रांगोळी काढून संदेश देण्यात आला आहे. प्रदूषणाच्या (Pollution) विळख्यात पंचगंगेचा गुदमरणारा श्वास मोकळा करण्यासाठी ‘पुन्हा साथ देऊया... चला, पंचगंगा वाचवूया’ या मोहिमेंतर्गत राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीने पंचगंगा प्रदूषणमुक्तीला पिरळ (ता. राधानगरी) येथून प्रारंभ झाला. समाजातील विविध संस्था, संघटनांबरोबरच शासनाची सर्व यंत्रणाही यात सहभागी झाल्या आहेत. या मोहिमेला सुरवात झाल्यानंतर गावागावात नदाकाढी स्नागत करण्यात येत आहे.पिरळ (ता. राधानगरी) येथून सकाळी आठला जलदिंडीला सुरुवात झाली.यावेळी स्वच्छता मोहीम व जलसंवर्धन प्रतिज्ञा घेताना महिलावर्ग. पंचगंगा वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून गावोगावी शपथ घेतली जात आहे.कोल्हापुरात तुकाराम माळी तालीम मंडळाने वार्ता फलकावर सकाळच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी कोल्हापूरकरांना आव्हान केले. पिरळ (ता. राधानगरी) येथून सकाळी आठला जलदिंडीला सुरुवात झाली. नदीकाठच्या गावांचे स्वागत स्वीकारत, त्या-त्या परिसरात प्रदूषणमुक्तीचा जागर करीत जलदिंडी इचलकरंजीकडे रवाना होणार आहे. दरम्यान, जलदिंडी मार्गावरील गावातील ग्रामस्थांनी आपापल्या परिसरातच उपस्थित राहून जलदिंडीचे स्वागत करावे, असे आवाहन करण्यात आले. पिरळ येथून पहिल्या टीमने जलदिंडीला प्रारंभ केल्यानंतर हळदी (ता. करवीर) येथून दुसऱ्या टीमने जलदिंडीला प्रारंभ केला.यावेळी महिलांकडून दिंडीचे स्वागत करण्यात आले. दोन्ही टीम नदीमार्गातील गावांचे स्वागत स्वीकारत सायंकाळी शिंगणापूर येथे जाणार आहेत. शुक्रवारी (ता. २२) सकाळी साडेसातला जलदिंडी शहरातील पंचगंगा घाटावर येईल. येथे स्वच्छता मोहीम, जलदिंडीचे स्वागत व जलसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली जाईल. यानिमित्त हजारो कोल्हापूरकर एकवटणार असून, शंभरहून अधिक संस्था, संघटनांसह तालमी व महाविद्यालये मोहिमेत सक्रिय सहभागी होणार आहेत.जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती असेल. त्यानंतर राजाराम बंधारामार्गे जलदिंडी इचलकरंजीकडे रवाना होईल. इचलकरंजी येथे सायंकाळी पाचला मुख्य सांगता सोहळा होणार आहे.गावोगावी या जलदिंडीचे स्वागत केले जात असून, मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला जात आहे.ग्रामस्थानी या जलदिंडीत टाळ, मृदुंगाची साथ देत अभंगातून स्वागत केले आहे.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.