Rajasthan Rajya Sabha Election : राजस्थानमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसनं (Congress) 4 पैकी 3 जागा जिंकत भाजपला मोठा धक्का दिलाय.
Rajasthan Rajya Sabha Election : राजस्थानमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसनं (Congress) 4 पैकी 3 जागा जिंकत भाजपला मोठा धक्का दिलाय. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala), मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी विजयी झाले आहेत. तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळालाय. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे घनश्याम तिवारी विजयी झाले आहेत. भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. ही निवडणूक जिंकवण्या मागं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा हात आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी...अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी जयपूरमधील त्यांच्या घरी बोलावलेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीला 107 पैकी 102 आमदार पोहोचले होते. गेहलोत यांना राजस्थानच्या राजकारणाचा 'जादूगार' म्हटलं जातं. तसं त्यांचा जादूशीही काहीसा संबंध आहे. कारण, हा त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता. डिसेंबर 2018 मध्ये राजस्थान निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर, अशोक गेहलोत पुन्हा मुख्यमंत्री झाले. तर, सचिन पायलट राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री या पदासाठी तयार नसल्याचं सांगितलं जात असलं, तरी समीकरण आणि ताकदीच्या बाबतीत त्यांनी गेहलोत यांना मागं टाकलं. तेव्हापासून दोघांमध्ये सतत वाद सुरुय. यावेळी सचिन यांनी उघडपणे बंडखोरी केल्यावर सर्वांच्या नजरा अशोक गेहलोत यांच्यावर खिळल्या होत्या.राजकीय वर्तुळात गेहलोत यांच्या 'जादू'च्या अनेक कहाण्या आहेत. असाच एक किस्सा 2008 च्या विधानसभा निवडणुकीशी संबंधित आहे. त्या निवडणुकीत काँग्रेसला २०० पैकी ९६ जागा मिळाल्या होत्या. अशा स्थितीत गेहलोत यांनी बसपाचे सहा आमदार काँग्रेसमध्ये विलीन केले. हे सर्व मायावतींच्या परवानगीशिवाय घडलं. अशा स्थितीत बसपच्या स्थानिक नेतृत्वानं आमदारांना अपात्र ठरवण्याचं आवाहन केलं. त्यावेळी राजस्थानमध्ये म्हटलं होतं की, 'जादूगारानं पुन्हा चमत्कार दाखवला आणि राजस्थानातून हत्ती गायब झाला. त्यानंतर पाच वर्षे सरकार आरामात चाललं. सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच या सहा आमदारांबाबतचा निर्णय गेहलोत यांच्या विरोधात आला असला, तरी तोपर्यंत त्यांची कामं झाली होती.'अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवीधर असलेल्या गेहलोत यांचा जन्म ३ मे १९५१ रोजी जोधपूर इथं झाला. त्यांचे वडील लक्ष्मण सिंह गेहलोत हे जादूगार होते. गेहलोत यांनीही वडिलांकडून जादूच्या युक्त्या शिकल्या. जरी त्यांनी तो व्यवसाय केला नसला, तरी त्यांच्या राजकीय डावपेचांना जादू म्हटलं गेलं. अशोक गेहलोत यांनी कॉलेजच्या काळात राजकारणात प्रवेश केला. काँग्रेस NSUI या विद्यार्थी संघटनेशी संबंधित आणि 1973 ते 1979 या कालावधीत राजस्थानचे NSUI अध्यक्ष होते. 1979 ते 1982 पर्यंत जोधपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते.1977 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी सरदारपुरा येथून निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मागितलं. त्यावेळी काँग्रेसवर संजय गांधींचं वर्चस्व होतं. त्यांनी गेहलोत यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीसाठी त्यांनी दुचाकी विकून त्यातून मिळालेल्या पैशातून संपूर्ण निवडणूक लढवली. जवळच्या मित्राच्या सलूनचं निवडणूक कार्यालयात रूपांतर केलं. पण, गेहलोत हे विधिमंडळाच्या पहिल्याच चाचणीत नापास झाले. या पराभवानं त्यांनी हार मानली नाहीय. तीन वर्षांनंतर 1980 मध्ये त्यांना जोधपूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळालं आणि ते खासदार झाले. यानंतर त्यांनी राजकारणाचं प्रत्येक निकष पूर्ण केलं.गेहलोत हे गांधीवादी नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, विरोधकांना सामोरं जाणं हेही गेहलोत यांचं वैशिष्ट्य आहे. राजस्थानमधील गुर्जर आरक्षण आंदोलनाचे नेते किरोरी सिंह बैंसला एकदा त्यांच्याबद्दल म्हणाले होते, 'गेहलोत हे अतिशय सजग नेते आहेत. त्यामुळं सावध राहा. कारण, जर कोणी त्यांना दूध पाजण्याचा प्रयत्न केला, तर मांजरीला दिल्याशिवाय ते पहिला घोट पिणार नाहीत.'गेहलोत जरी साधे असले तरी कोणताही कठोर निर्णय घेण्यात ते मागे हटत नाहीत. याची अनेक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, 2012 मध्ये आसाराम बापूंना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करणं किंवा 2003 मध्ये माजी विहिंप नेते प्रवीण तोगडिया यांना तुरुंगात टाकणं. अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या तीन वेगवेगळ्या केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. इंदिरांसोबत ते राजीव गांधींच्या मंत्रिमंडळाचे सदस्यही होते. पुढे ते नरसिंह राव सरकारमध्ये मंत्रीही झाले. आता ते गांधी घराण्याच्या तिसर्या पिढीच्या म्हणजेच, राहुल गांधींच्या संगतीनं नवं राजकारण चालवत आहेत.राजकीय विरोध असतानाही गेहलोत यांना भैरोसिंग शेखावत यांच्याबद्दल खूप आदर आहे. शेखावत यांच्या निधनानंतर प्रत्येक जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहणारे गेहलोत हे पहिले नेते आहेत.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.