kunal patil sakal
जळगाव

धुळे तालुक्याला २९ कोटी २१ लाख प्राप्त ; कुणाल पाटील

आमदार कुणाल पाटील : अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाई; लवकरच मदतनिधी खात्यात

सकाळ वृत्तसेवा

धुळे : सप्टेंबर-२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून नुकसान भरपाईपोटी २९ कोटी २१ लाख ८० हजार रुपये मंजूर झाले. या मदतनिधीचे वाटप करण्याचा आदेशही प्राप्त झाला आहे. त्यामुळे लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतनिधी जमा होईल, अशी माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली.

५ ते १३ सप्टेंबर-२०२१ धुळे जिल्हयात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. या नुकसानीची दखल घेत आमदार श्री. पाटील यांनी तातडीने पाहणी केली होती. तसेच पंचनामा करून नुकसानीचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. दरम्यान, धुळे तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन मदतीची मागणीही केली होती. या पाठपुराव्यामुळे धुळे तालुक्यातील एकूण ४७ हजार २२७ शेतकऱ्यांसाठी २९ कोटी २१ लाख ८० हजार रुपये मदत निधी प्राप्त झाला. हा निधी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ या मदतीचे वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत, असे आमदार श्री. पाटील यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT