जळगाव

सुबाभूळ शेती ठरतेय दिलासादायी; लोहटार येथील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

चंद्रकांत चौधरी

पाचोरा: गेल्या काही वर्षांपासून विविधांगी कारणामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला असून खरीप व रब्बीचे हातात आलेले उत्पादन नष्ट होण्याचे सातत्य कायम असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना वाढत आहे परंतु सुबाभूळ शेती अशा काळात दिलासादायी ठरत असल्याचा यशस्वी प्रयोग लोहटार ( ता पाचोरा) येथील विजय वाणी या शेतकऱ्याने केला आहे.
 

आवश्य वाचा- घोडा ना वराती..साध्या पद्धतीने का होईना लग्नसराई जोरात..आता डिजिटलच लग्नपत्रिका

पारंपारिक शेती साठी लागणारा खर्च, वाढती मजुरी, मजुरांची चणचण, निसर्ग व पावसाचा लहरीपणा यामुळे खरीप व रब्बी उत्पादन नष्ट होऊन शेतकरी हवालदिल होण्याचे प्रकार व प्रमाण वाढत आहे.यातून मार्ग काढत आदर्श शेतकरी विजय वाणी यांनी सुबाभूळ ची लागवड करून चांगले उत्पादन काढले आहे.

सुबाभूळचा प्रयोग ठरला यशस्वी

वाणी यांनी 100 एकरांपैकी 30 एकरात सुबाभूळ ची लागवड केली आहे. उर्वरित क्षेत्रात केळी, लिंबू, हळद ,गहू, मोसंबी, मका, पपई असे विविध प्रकारचे उत्पादन ते घेतात. त्यांनी सोनगड (गुजरात) येथील पेपर मिलशी करार करून सुबाभूळची लागवड केली व त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे .या पेपर मिलशी करार केल्यानंतर त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने सुबाभूळची लागवड केली. पहिली कापणी 3 हजार 600 रुपये टन प्रमाणे तर दुसऱ्या कापणीचे लाकूड 3 हजार 200 रुपये टनाने पेपर मिल खरेदी करते. हेक्टरी 3 लाख 60 हजार रुपये उत्पन्न त्यातून मिळते. 4 कापण्यासाठीचे करार या कंपनीशी त्यांनी केले आहेत.

अशी केली लागवड

कंपनीने बियाणे पुरवल्या नंतर नांगरणी करून व ठिबकच्या सहाय्याने त्यांनी पाच बाय अडीच अशा अंतराने लागवड केली आहे. झाडे लहान असतानाच सुपर व पोटॅश व गरजेनुसार पाणी दिले. झाडांची वाढ झपाट्याने होत असून 16 महिन्यात झाडाची जाडी 5 ते 10 इंच ,उंची सुमारे 35 फूट झाली आहे .विशेष म्हणजे या झाडांखाली गवत उगवत नाही. कोणत्याही प्रकारची किटकनाशकांची फवारणी करावी लागत नाही. कंपनीशी करार केल्यानंतर 3 हजार 600 रुपये टन प्रमाणे पेपर मिल माल खरेदी करते. एक झाड सुमारे 25 किलो पर्यंतचे येत असून 150 टन लाकूड मिळणे अपेक्षित असल्याने 3 लाख 60 हजार रुपयांचे उत्पन्न त्यांनी अपेक्षित मानले आहे. 10 वर्षात 4 कापण्यासाठीचा पेपर मिलचा करार असल्याने तसेच मजुरांसाठीचा पैसा, पावसाचा लहरीपणा ,फवारणी साठीचा खर्च वाचून चांगले उत्पादन ह्यामुळे हाती येत असल्याने शेतकऱ्यांनी इतर उत्पादना प्रमाणेच थोड्या प्रमाणात का असेना सुबाभुळ लागवड करून आर्थिक विवंचना नष्ट करण्याचा यशस्वी प्रयोग प्रयत्न करावा असे आवाहन विजय वाणी यांनी केले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICICI Bank: बँकेची मोठी घोषणा... आता खात्यात 10,000 रुपयां ऐवजी किमान 50,000 रुपये ठेवावे लागतील

Mohammed Siraj: सिराज माझ्यावर प्रचंड रागावला होता...! अजिंक्य रहाणेकडून मोठी कबुली; नेमकं काय झालेलं?

सेटवर सगळ्यांसोबत कशी वागते तेजश्री प्रधान? मालिकेतील भावाने सांगितला अनुभव; म्हणाला- अशी गोड दिसते पण ती खूप...

Ladki Bahin Yojana : पुरुष 'लाडकी बहीण' कसे बनले? २६ लाख अपात्र असलेल्यांचे अर्ज मंजूर कसे झाले? वाचा नेमका कुठं घोळ झाला

Pension Dispute Assault : पेन्शनचे पैसे न दिल्याने पोरानं काठीने आईला केली मारहाण, पत्नी आडवण्यास गेली अन्

SCROLL FOR NEXT