Jalgaon amrut mission second stage Government approval
Jalgaon amrut mission second stage Government approval  sakal
जळगाव

जळगाव : अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास शासनाची मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पाणी पुरवठ्याच्या अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहरातील वाढीव वस्त्याचा १७८ किलोमीटरचा भाग राहिला होता. आता शासनाने त्यालाही मंजुरी दिली असून त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. प्रत्येक घराला शुद्ध पाणीपुरवठा या शासनाच्या धोरणानुसार शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी ‘अमृत’योजनेला मंजुरी मिळाली. पहिल्या टप्प्यातील ५६५ किलोमीटरच्या कामाला महापालिकेच्या माध्यमातून प्रारंभही झाला. आता योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च २०२१ पर्यंत या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होणार असून त्यांची चाचणीही करण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव

पहिला टप्प्यात ५६५ किलोमीटरला मंजुरी मिळाली, परंतु शहराचा आता विस्तार झाला असून नवीन काही कॉलन्या तयार झाल्या आहेत, तर काही जुना भागही आहे. अशा एकूण १७८ किलोमीटरच्या भागात ही योजना मंजूर झाली नव्हती, त्यामुळे हा भाग ‘अमृत’योजनेत येत नव्हता, मात्र महापालिका प्रशासनाने या नवीन व काही राहिलेल्या जुन्या भागात ही योजना राबविण्यासाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता.

राज्य शासनाची मंजुरी

महापालिकेला अमृत योजनेसाठी एकूण २४८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता, त्यात पहिल्या टप्प्यात १९३ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली होती. आता राहिलेल्या निधीतून दुसऱ्या टप्प्याचे काम करण्यात येणार आहे. शासनाने त्याला मंजुरी दिली आहे, याअतंर्गत कोणत्याही नवीन निविदा न काढता त्याच मक्तेदारामार्फत हे काम करण्यात येणार आहे. शासनातर्फे त्याबाबत अधिकृत मंजुरी पत्र आल्यानंतर हे काम सुर करण्यात येणार आहे.

पहिला टप्पा मार्चला पूर्ण

अमृत योजनेच्या पहिल्या १७८ किलोमीटरचे काम अंतिम टप्प्यात आहे, मार्च २०२१ अखेर ते काम पूर्ण होणार असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. या योजनेंतर्गंत पाणी पुरवठ्याची चाचणीही करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.

‘वॉटर मीटर’ सद्यःस्थितीत नाही

राज्यशासनाची अमृत योजना सुर झाल्यानंतर घरगुती नळाना ‘वॉटर मीटर ’बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र याबाबत अधिक माहिती अशी कि, अमृत योजनेच्या अंतर्गत वॉटर मीटर बसविण्याची कोणतीही योजना नाही,मात्र राज्यशासनाकडे त्या बाबत प्रस्ताव आहे, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही,तो निर्णय झाल्यानंतर ते बसविण्याबाबत निर्णय होईल, त्यामुळे सद्या तरी अमृत योजना सुरू झाल्यावर ‘वॉटर मिटर’बसविण्यात येणार नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT