Jalgaon Stop cutting off farmers electricity connections
Jalgaon Stop cutting off farmers electricity connections sakal
जळगाव

‘शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन कापणे बंद करा’

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महावितरणतर्फे शेतीपंपाचे वीज कनेक्‍शन बिल न भरल्‍यामुळे कापले जात आहे. अशा पद्धतीने बेकायदेशीर कनेक्‍शन कट करणे बंद करावे, अन्‍यथा सर्व शेतकरी मिळून आंदोलन उभारून मुख्‍य लाइन कापतील, असा इशारा शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्‍यक्ष विठ्ठल पवार यांनी गुरुवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत दिला.

काबरा फाउंडेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेस प्रदेश सचिव डॉ. महेंद्र काबरा, जिल्‍हाध्‍यक्ष अजय जाजू उपस्‍थित होते. पवार यांनी सांगितले, की महावितरण कट करत असलेले कनेक्‍शन हे अन्न‍ सुरक्षा कायद्याच्‍या तरतुदीच्या कलम ३१ व परिशिष्ट ३ चा भंग करणारे आहे. वीज वितरण कंपनीच्‍या बेकायदा कृतीमुळे सिंचनाअभावी पिके नष्‍ट होत आहेत. यामुळे शेतकरी आत्‍महत्‍या करतो. यामुळे कनेक्‍शन कापण्याची कारवाई बंद करावी, अन्‍यथा शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेकडून मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा पवार यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT