anajani river 
जळगाव

धरणगावचा पाणीपुरवठा होणार सुरळीत; अंजनीचे आवर्तन दोन दिवसांत मिळणार

डी. एस. पाटील

धरणगाव (जळगाव) : शहरातील गंभीर बनलेल्या पाणीपुरवठ्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वत: रुग्णालयात कोविडचा उपचार घेत असताना अ‍ॅक्शन मोडवर येत अंजनी धरणाचे आवर्तन सोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मंत्री पाटील यांनी गुरुवारी (ता. २५) जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना तातडीने अंजनी नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता धरणगाव शहरात पुढील दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. 
धरणगाव शहरात तब्बल २२ ते २५ दिवसानंतर पाणीपुरवठा सुरू होता. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी (ता. २५) तत्काळ अंजनी नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले. धावडा तसेच पिंप्री येथे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली होती. दोघेही ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरू आहे. 

गाळ साचल्‍याने अडचण
धावडा येथील मुख्य जलवाहिनीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. हा गाळ काढण्याचे काम पुणे येथील एका कंपनीला देण्यात आले आहे. पुढील आठवडाभरात धावडा - धरणगाव जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरळीत होईल. मागील काही दिवसांपासून गाळ काढण्याचे काम सुरू असल्यामुळे पिंप्री येथील शहराला पाणीपुरवठा केला जात होता. परंतु जमिनीतील पाणीसाठा संपल्यामुळे धरणगावकरांवर पुन्हा एकदा पाण्याचे संकट निर्माण झाले होते. या प्रश्‍नी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना गटनेते पप्पू भावे आणि शिवसैनिक रवींद्र कंखरे यांनी थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. तसेच अंजनीत पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला. यानंतर पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. त्यानुसार अंजनी गुरुवारी (ता. २५) रात्रीपर्यंत १.२० दलघमी एवढे पाण्याचे आवर्तन पोहोचणार आहे. 

जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर 
दरम्यान, पिंप्री ते धरणगाव फिल्टर प्लांट अशी नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. जुन्या पाण्याच्या टाकीपासून तर पाणी शुद्धीकरण प्रकल्पापर्यंत ७२ लाखांची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे धरणगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी संपूर्ण गावात नवीन जलवाहिनी टाकावी लागणार आहे. शहरातील पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर करण्याचे नियोजन सुरू आहे. जेणे करून लवकरात लवकर शहराला नियमित पाणीपुरवठा होईल. दरम्यान, खुद्द रूग्णालयात उपचार घेत असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील हे अ‍ॅक्शन मोडवर आल्यानंतरच धरणगावचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : चंद्रकांत पाटलांना जाब विचारणार, घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT