goat dead 
जळगाव

पहाटेचा थरार..विद्युत तार तुटली झोपडी थोडक्‍यात वाचली, पण ३५ बकऱ्यांचा मृत्‍यू

राजेंद्र पाटील

नांद्रा (जळगाव) : उन्हाळ्याचे दिवस असल्‍याने शेळ्या- बकऱ्या शेतात बसविले जातात. त्‍यानुसार भिल्‍ल समाजातील व्यक्‍तीने दीडशे बकऱ्या गावातील रवींद्र देशमुख यांच्या शेतात बसविल्‍या होत्‍या. पण आज पहाटे मोठा अनर्थ झाला. चालू लाईनवरील विद्युत तार अचानक तुटून पडली. यात ३५ बकऱ्यांचा मृत्‍यू झाला.
राणीचे बांबरूड येथील राजाराम सखाराम भिल्‍ल यांच्या दीडशे बकऱ्या जुन्ने शिवारात रवींद्र देशमुख यांच्या शेतात बसविण्यात आल्‍या आहेत. येथेच बकऱ्यांसाठी वेगवेगळे तार कंपाउंड तयार करण्यात आले आहे. तर त्‍याच्याच बाजूला राहण्यासाठी दोन झोपड्या तयार करण्यात आल्‍या आहेत. याच ठिकाणाहून हाय होल्‍टेजची विद्युत लाईन गेलेली आहे.

अनर्थ टळला
राजाराम भिल्‍ल यांच्या झोपड्यांच्यावरून हाय होल्‍टेजची विद्युत लाईन गेलेली आहे. सकाळी सातच्या सुमारास मेन लाईनच्या खांबावरील क्लँम तुटल्यामुळे विजेचा तार खाली पडली. यात विद्युत प्रवाह चालू होता. ही तार झोपडीच्या बाजूला पडल्‍याने मोठा अनर्थ टळला. तार झोपडीवर पडली असता स्‍पार्किंगमुळे झोपडीला आग लागण्याची शक्‍यता होती. शिवाय सकाळी भिल्‍ल परिवाराची बाहेर धावपळ सुरू असल्‍याने शॉक लागून काही घटना घडण्याची शक्‍यता होती. परंतु, सुदैवाने हा अनर्थ टळला.‍

बकऱ्यांचा होरपळून मृत्‍यू
विद्युत तार बकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्‍या तारेच्या कपांउंड आणि बकऱ्यांवर पडली. यामुळे संपुर्ण कंपाउंडमध्ये विद्युत प्रवाह गेल्‍याने शेतातील ३५ बकऱ्यांचा होरपळून मृत्‍यू झाला. बकऱ्या विकून उदरनिर्वाह करत होते. अशात ३५ बकऱ्यांचा मृत्‍यू झाल्‍याने मोठे नुकसान झाले आहे.

संपादन- राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT