Hatnur Dam
Hatnur Dam 
जळगाव

हतनूर धरणातून ५८ हजार ६७५ क्यूसेकचा विसर्ग;२० दरवाजे उघडले

देविदास वाणी


जळगाव : हतनूर धरणाच्या (Hatnur Dam) लाभ क्षेत्रात व मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) तापी नदी (Tapi River) क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे हतनूर प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडून ४८ हजार २०४ क्यूसेकचा विसर्ग केला जात होता. शनिवारी (ता. २१) सकाळी प्रकल्पाचे २० दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून ६० हजार ६७१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यातील गिरणा नदीक्षेत्र (Girna River) परिसरात देखील सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या चोवीस तासात गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात ४.६७ दलघमी पाण्याची आवक झाली आहे.


तब्बल दहा ते पंधरा दिवसांनंतर पावसाचे दमदार पुनरागमन झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांत काही प्रमाणात आवक झाली आहे. तापी नदीवरील हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत ३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, ९६.४८ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. परिणामी, पाणीपातळीत वाढ झाल्याने हतनूर प्रकल्पाचे २० गेट उघडून ५८ हजार ६७५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात केला जात आहे.

चोवीस तासांत ३८ मिलिमीटर पाऊस
गिरणा प्रकल्पात जुलैअखेरीस ३५ टक्के उपयुक्त जलसाठा होता. गिरणा नदीक्षेत्र व प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत ३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने ४.६७ दलघमी पाण्याची आवक झाली असून, सद्यःस्थितीत गिरणा प्रकल्पात ४२.६४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.


अग्नावतीत अजूनही ठणठणाट
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी गिरणा- ४२.६४, वाघूर- ६१.८१ टक्के, तसेच मध्यम व लघू प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरूळ शंभर टक्के, सुकी- ९१.४३, मोर- ५४.५१, बोरी- ६५.८५, मन्याड- ५६.८७ अशी समाधानकारक स्थिती आहे. अन्य प्रकल्पांत थोड्याफार प्रमाणात पाण्याची आवक होत असून, अंजनी- २८.८२, गूळ- २८.७८, भोकरबारी- १३.५३, बहुळा- १४.४३, हिवरा- ५.१७ टक्के अशी उपयुक्त जलसाठा स्थिती आहे. मात्र, अग्नावती प्रकल्पात अजूनही ठणठणाट आहे.


‘गिरणा’मध्ये आवक गरजेची
नाशिक जिल्ह्यात गिरणा नदीवर चणकापूर अर्जुनसागर, तसेच हरणबारी, केळझर, नागासाक्यासह नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज या प्रकल्पात पाणीसाठा पूर्ण झाल्यानंतरच गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक होते. सद्यःस्थितीत गिरणा प्रकल्पाच्या वरील हरणबारी शंभर टक्के भरले असून, चणकापूर- ६७.१०, अर्जुनसागर- ७३.२४, तर माणिकपुंज- ९९.७९ टक्के भरले आहे. त्यामुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गिरणा प्रकल्पात पाण्याची अधिक आवक होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT