trivikram tempal
trivikram tempal 
जळगाव

आषाढीला श्री त्रिविक्रमाचे मंदिर राहणार प्रथमच दर्शनासाठी बंद...साडेतीनशे वर्षांची परंपरा खंडित  

सकाळ वृत्तसेवा

शेंदुर्णी (ता. जामनेर) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 350 वर्षांची परंपरा खंडित होणार असून आषाढी एकादशीला भगवान श्री त्रिविक्रम महाराजांचे मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. तसेच, पाच दिवस गावात जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याचा निर्णय शांतता कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. 

आषाढीच्या पार्श्वभूमीवर येथील पोलिस दूरक्षेत्र कार्यालयामध्ये शांतता कमिटीच्या बैठक झाली. यावेळी मुख्याधिकारी साजिद पिंजारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलिस उपनिरीक्षक किरण बर्गे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, राष्ट्रवादी कार्यकर्ते योगेश गुजर, धीरज जैन, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रवींद्र गुजर, कोडोबा गुजर, पंडितराव जोहरे, नगरसेवक राहुल धनगर, संत श्री कडोजी महाराज संस्थानतर्फे तुषार भगत, त्रिविक्रम मंदिर संस्थान तर्फे भोपे, सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत शुक्‍ला आदी मान्यवर उपस्थित होते. 

दर्शनाची परंपरा खंडित होणार 
साडेतीनशे वर्षांपासून प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान श्री त्रिविक्रम महाराजांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील लाखो भाविक एक दिवस आधीपासूनच आषाढीनिमित्त येत असतात. एका आख्यायिकेनुसार आषाढी एकादशीला भगवान श्री विठ्ठल हे भगवान श्री त्रिविक्रम महाराजांच्या मूर्तीमध्ये व्यास करीत असल्याने ज्या भाषिकांना पंढरपूर जाणे शक्‍य नाही ते भाविक येथे दर्शनासाठी येतात. आसपासच्या गावांमधून दिंड्या पालख्या मोठ्या संख्येने येतात. परंतु, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव बघता साडेतीनशे वर्षांची परंपरा खंडित होणार आहे. पहिल्यांदाच आषाढीला दर्शनासाठी मंदिर बंद राहणार आहे. 

मोजक्‍याच व्यक्‍तींच्या उपस्थितीत पूजा 
आषाढी एकादशीला आदल्या दिवशी मध्यरात्री भगवान श्री त्रिविक्रमाच्या मूर्तीची ठराविक लोकांच्या उपस्थितीत विधिवत शास्त्रोक्त मंत्रोच्चाराने पूजाअर्चा होणार आहे. मात्र भाविकांना दर्शन घेता येणार नाही. तसेच, दिवसभराचे कार्यक्रम दिंडी, कीर्तन सोहळा रद्द करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये आणि दर्शनासाठी येऊ नये यासाठी एक दिवस आधीच बॅरेकेटींग लावून परिसर चोहोबाजूंनी सील करण्यात येणार आहे. तसेच, याबाबतचे फलक मंदिर परिसरामध्ये लावण्यात येत आहे. 

पाच दिवसांचा जनता कर्फ्यू. 
येथे कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता आणि बाजारपेठांमधील वाढती गर्दी बघता पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. 28 जून ते 1 जुलै दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT