KHADSE
KHADSE 
जळगाव

अहंपणामूळे राज्यातील सत्ता गेली, तरी भाजपच्या नेत्यांचा अहंपणा गेला नाही     

भूषण श्रीखंडे

जळगाव ः ज्या अहंमपणामूळे राज्यातील भाजपची सत्ता गेली, तरी त्या नेत्यांमधील अजून ही अहंपणा गेलेला दिसत नाही.  भाजपा पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असलेले कार्यकर्ते, नेते यांना थांबविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पडणार, तुम्हाला या, त्या समितीवर घेणार, असे कारणे सांगून थांबवण्याचा प्रयत्न या नेत्यांना करावा लागत आहे. परंतू राज्यातील महाविकास आघाडी सरकार विकासाच्या कामांमधून पायरोवत आहे. आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार असे मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची संवाद यात्रा निमित्त नियोजनाची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालायात झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, जेष्ठ नेते अरुणभाई गुजराथी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एकनाथराव खडसे मार्गदर्शन करतांना म्हणाले, की जयंत पाटील यांचा जळगाव दौरा असून त्यांना जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद दाखवायची आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकजूटीने , एकनिष्टेने काम करायचे आहे. राष्ट्रवादीपक्ष हा तळागळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करायचा आहे. जिल्हायातील भाजपचे अनेक जण राष्ट्रवादीत येण्यास ईच्छूक असून त्यांचा प्रवेशाबाबत नियोजन लवकरच केले जाणार असल्याचे माहिती खडसेंनी दिली. 

मी पून्हा येईल, मी पून्हा येईल
भाजप नेत्यांवर खडसेंनी पून्हा त्यांच्या शैलीत हल्ला चढवीत भाजप नेत्यांवर आपले कार्यकर्ते आपल्या सोडून जाऊ नये यासाठी भाजपचे सरकार पून्हा येणार, महाविकास आघाडीचे सरकार पडणार असे म्हणून वेळ काढायची आहे. परंतू महाविकास आघाडीचे सरकार पूर्ण काळ चालणार आणि भाजप नेत्यांवर निवडणूकीच्या वेळी मी पून्हा येईल, मी पून्हा येईल असे म्हणण्याची वेळ येणार अशी टिका करून त्यांनी अप्रत्यक्षरीत्या विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शाब्दीक टोला लगावीला.  


राजकारणात कोणती ही गोष्ट कायम नसते
जेष्ट नेते अरुणभाई गुजराती मार्गदर्शन करतांना म्हणाले, की प्रदेशध्यश्र जयंत पाटील यांच्यासोबत ३० वर्ष काम करण्याची संधी मिळाली. राजकारणात कोणतीच गोष्ट कायम नसते,ती वेळनेनुसार बदलत असते. आज नाथाभाऊ आमच्या सोबत आहे, हे आता पाहून आनंद वाटत आहे. शरदंचद्र पवार साहेबांनी तीन वर्ष प्रदेशाध्यक्षाची संधी दिली. मंत्री महोदयांना प्रेम कार्यकर्त्यांकडून मिळत नाही तेवढे प्रेम प्रदेशाध्यक्षांना मिळत असते.  राष्ट्रवादीपक्ष अधिक मजबूत आपल्याला कारायचा असून प्रदेशाध्यक्षांचा दौऱ्यात संर्पूण जिल्हा राष्ट्रवादीशी उभा असल्याचे दाखवाचे आहे. रविंद्र भय्यासाहेब नाथाऊंशी लढून लढून थकले, पण आता नाथाभाऊ सोबत आल्याने रविंद्रभय्यांची ताकद वाढली आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला राष्ट्रवादी मजबूत करण्याचा प्रयत्न आपण करू असे मार्गदर्शन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT