shugar  
जळगाव

साखर हंगाम मध्यावर; राज्यात ४०५ लाख टन गाळप 

बालकृष्ण पाटील


गणपूर (ता. चोपडा)  : राज्यभरात साखर हंगाम मध्यावर येत असून, २९ डिसेंबरअखेर ४०५ लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ३८३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. डिसेंबरअखेरचा हंगाम पाहता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.४५ इतका राहिला आहे. 

राज्यभरात या वर्षी ९० सहकारी व ७८ खासगी साखर कारखान्यांनी आतापर्यंत गाळप हंगाम सुरू केला असून, बऱ्याच भागात ऊसतोडणी हंगाम मध्यावर आला आहे. राज्यातील आठही विभागांचा विचार करता रोज सुमारे पावणेसात लाख टन उसाचे गाळप होत असून, धुराळ्यांनी वेग धरला आहे. राज्यभरात ऊसतोडणी मजूर व हार्वेस्टिंग मशिनच्या सहाय्याने ऊसतोडणी सुरू आहे. 


सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागात
राज्यात आतापर्यंत सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागात असून, तो ११ आहे, तर सर्वाधिक कमी साखर उतारा नागपूर विभागाचा असून, तो ७.७९ इतका आहे, तर राज्यात आतापर्यंत ९.४५ साखर उतारा राहिला आहे. 

खानदेशातील स्थिती 
खानदेशात शहादा येथील तापी सातपुडा सहकारी कारखान्याने एक लाख ८५ हजार ५६० टन उसाचे गाळप केले असून, एक लाख ४९ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा ८.६ इतका आहे. डोकारे येथील आदिवासी साखर कारखान्यात ४८ हजार ८२१ टन गाळप झाले असून, ३७ हजार २०० क्विंटल साखर उत्पादन केले असून, उतारा ७.६२ इतका आहे. मुक्ताई शुगरने आतापर्यंत एक लाख ५३ हजार ५५५ टन उसाचे गाळप केले असून, एक लाख २७ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा ८.३३ इतका आहे. सावेर (जि. धुळे) येथील दत्तप्रभू ॲग्रो या जॅगरी प्रकल्पात पाच हजार २०० टन उसाचे गाळप झाले आहे. खानदेशात बाहेरील बऱ्याच साखर कारखान्यांची ऊसतोड आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs MI Live: बापमाणूस सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा कर्णधार! हार्दिक पांड्या का नाही खेळला? रजत पाटीदारने टॉस जिंकला...

Pune News: पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात अव्यवस्थेचा कळस; प्रयोग रद्द करण्याची नामुष्की, ध्वनीव्यवस्थेत बिघाड अन् वातानुकूलित यंत्रणाही नादुरुस्त..

Nagpur Goa Shaktipeeth Highway: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा व्हायरल; नेमका कसा असणार रूट?

कोण आहेत कीर्तना? २९ वर्षीय सर्वात तरुण मंत्री, हिंदीसह ५ भाषा येतात; विजय यांच्या मंत्रिमंडळातली एकमेव महिला

Crime: धक्कादायक! क्षुल्लक वादातून सुनेनं प्रसिद्ध डॉक्टर सासऱ्यांना संपवलं, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT