Arun Jadhav 
काही सुखद

सोसूनही खूप काही तो लढतोय उपेक्षितांसाठी... 

वसंत सानप

जामखेड : स्वतः कोल्हाटी समाजात जन्मल्यानंतर उपेक्षेचे चटके सोसत उच्चविद्याविभूषित झाल्यानंतर समाजप्रती असलेले दायित्व व्यक्त करण्यासाठी आणि अन्य उपेक्षितांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यासह समाजाच्या जीवनात चैतन्य निर्माण करण्यसाठी त्याने पुढाकार घेतला. त्याच्या मदतीला हात पुढे येत गेले, त्याचे कार्य विस्तारत गेले. पिढ्यान्‌पिढ्या उपेक्षेचे चटके सोसलेल्यांच्या जीवनात त्याने जगण्याची केवळ उमेदच निर्माण केली नाही, तर त्याला वेगळी दिशा देऊन कर्तृत्वसंपन्न होण्यासाठी हातभारही लावला, ही कहाणी आहे येथील अरुण जाधव या कार्यकर्त्याची... 

वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून उपेक्षितांसाठी लढा उभारणाऱ्या जाधव यांच्या कार्याचा गौरव अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या 'महाराष्ट्र फाउंडेशन'ने पुण्यात केला. जाधव यांच्या कार्याला जामखेड येथील विविध संघटनांनीही गौरवले आहे. त्यांनी उच्चविद्याविभूषित झाल्यानंतर नोकरीच्या वाटा न शोधता, जन्मतःच उपेक्षितांच्या प्रश्नांची जाणीव असल्याने त्यांच्या उत्थानासाठी काम सुरू केले. रडणाऱ्यांचे डोळे पुसले. जगणे हरविलेल्यांमध्ये स्फुल्लिंग पेटविले.

एवढेच नाही, तर उपेक्षितांना न्याय मिळवून देताना कायद्याचा आधार घेण्यासाठी ते स्वतः कायद्याचे पदवीधरही झाले. पारधी, भिल्ल, मदारी आणि इतर उपेक्षितांना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यातूनच सरकारच्या माध्यमातून पारधी आणि इतर आदिवासींसाठी लिंपणगाव (ता. श्रीगोंदा) येथे पंचावन्न जणांना निवारा मिळवून दिला. हक्काची पक्की घरे दिली. पारधी समाजातील दीडशे मुलांना पोलिस भरती प्रशिक्षणासाठी पाठविले, त्यामुळे त्यांना पोलिस दलात दाखल होण्याची संधी मिळाली. पन्नास नाचणाऱ्या कलाकार मुलींना सरकारच्या कलावंत मानधन योजनेचा लाभ मिळवून दिला. त्यांच्या मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून दिला. 

खर्डा (ता. जामखेड) येथे मदारी विकास आराखडा हाती घेऊन वीस कुटुंबांसाठीच्या निवाऱ्याला मंजुरी मिळवली. पारधी विकास आराखड्याच्या माध्यमातून विशिष्ट रकमेची तरतूद करून त्यांच्या निवाऱ्याबरोबरच शिक्षण, व्यवसायासाठीचे नियोजन हाती घेतले. केवळ सरकारच्या सवलतींवर, योजनांवर अवलंबून न राहता जाधव यांनी उपेक्षितांमधील सुप्त गुण शोधले. बोलणाऱ्याला चांगला वक्ता बनविले. लिहिण्याची आवड असणाऱ्यांना लिहिते केले. पुस्तकरूपाने त्यांचा खडतर जीवनप्रवास जगासमोर पोचवला. एवढेच नाही, तर परिस्थितीमुळे शाळेची पायरी चढण्यास थरथरणाऱ्या पायांचा आधार बनून त्यांच्या मुलांसाठी जामखेड येथे चार वर्षांपासून स्वखर्चाने 'निवारा बालसुधारगृह' सुरू केले. 

'मला शिकायचंय' हे अभियान जाधव यांनी हाती घेतले आहे. कर्जत, जामखेड, श्रीगोंदा या तीन तालुक्‍यांत त्यांचे काम सुरू आहे. दलित, भटक्‍या विमुक्त समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी जाधव यांनी झोकून देऊन काम केले. याकरिता आंदोलनाचा लढा पेटता ठेवला. निखारा बनून दबलेला आवाज फुलवला. त्यांच्या या खडतर प्रवासात त्यांची पत्नी, आई, बहीण, सहकारी, विविध संघटनांचे विशेष सहकार्य मिळाले. या लढ्याच्या उभारणीत समाजातील अनेक घटकांचे सहकार्य मिळाले, असे अरुण जाधव आवर्जून सांगतात. त्यांनी आपले जीवन सामाजिक चळवळीसाठी आणि समाजासाठी अर्पण करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

काही सुखद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon News : मालेगावच्या दरेगाव शिवारात 'विषाचा' धूर! अवैध प्लास्टिक कारखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

IPL 2026 Updates: गतविजेत्या RCB चे सामने मुंबईनंतर पुण्यातही नाही होणार! ५ सामने एकीकडे, तर २ दुसरीकडे; जाणून घ्या ब्रेकिंग न्यूज

Gunratna Sadavarte: 'राज ठाकरे रंग बदले, उद्धव संग मंच पे चढले...' गुणरत्न सदावर्ते यांची होळीनिमित्त राजकीय कविता; Video Viral

Video: ७० वर्षांच्या जावयाची गाढवावरुन मिरवणूक; तरुण जावई पळून गेला अन्...

स्मृती मानधना जगात नंबर १! ODI Ranking मध्ये भारतीय बॅटरची झेप, चार वर्षांनी गोलंदाजीतील इक्लेस्टोनचं सिंहासन खालसा

SCROLL FOR NEXT