काही सुखद

पाडळशिंगी तलावात पहिल्याच पावसात साठा

सकाळवृत्तसेवा

बीड : सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाडळशिंगी (ता. गेवराई) गावातील मुख्य जलस्रोत असलेला तलाव "सकाळ रिलीफ फंडा‘तून मागील वर्षी गाळमुक्त झाला. यंदाही काम हाती घेतले आहे. दरम्यान, रविवारी रात्री झालेल्या पहिल्याच पावसामुळे तलाव अर्धा भरला आहे. या तलावात बऱ्हाणपूरहून (ता. गेवराई) येणाऱ्या तीन किलोमीटर अंतराच्या नदीचे "सकाळ रिलीफ फंडा‘तून खोलीकरण-रुंदीकरण केल्याने साठा वाढण्यास लाभ झाला आहे.
 

पाडळशिंगीची पाणीपुरवठा योजना, सिंचन सुविधा असलेल्या तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला होता. परिणामी तलावाची साठवण आणि झिरपण क्षमता कमी झाली होती. त्यामुळे जानेवारीअखेरीस हा तलाव कोरडा पडायचा. त्यामुळे तनिष्का गटाच्या मागणीनुसार मागील वर्षी "सकाळ रिलीफ फंडा‘तून तलावातील तब्बल 15 हजार ब्रास गाळ काढण्यात आला. तर यंदाही बऱ्हाणपूरहून पाडळशिंगी तलावात येणाऱ्या तीन किलोमीटर नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण सकाळ रिलीफ फंड, तनिष्का व्यासपीठ, साम टीव्हीच्या माध्यमातून करण्यात आले. यंदाही तलावातील गाळ काढण्यात आला. रविवारी रात्री या भागात जोरदार पाऊस झाल्याने तलावात मोठ्या प्रमाणात साठा झाला. गाळ काढल्यामुळे व खोलीकरण-रुंदीकरणामुळे म्हणजे, तलावाच्या खालच्या बाजूला असलेल्या विंधन विहिरींची (बोअर) पाणीपातळीही वाढल्याचे विकास चौधरी यांनी सांगितले. या दोन्ही कामांमुळे गावाचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्‍न सुटणार असल्याचे भीष्मा घोडके, मकरध्वज जगताप म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : 'राजधानी'त भिडणार दिल्ली-मुंबई, कोण जिंकणार?

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

New Rules From 1st May: 1 मे पासून बदलणार पैसे आणि बँकांशी संबंधित नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

SCROLL FOR NEXT