Kailas-Gaikwad
Kailas-Gaikwad 
काही सुखद

#ThursdayMotivation : निराधार कुटुंबासाठी गाव झाले एकत्र

रुपेश बुट्टे

आंबेठाण - कुटुंबातील प्रमुख व कर्त्या तरुणाचे निधन झाल्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा राहिला. निराधार झालेल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी दशक्रिया विधीला उपस्थित असलेल्या नागरिकांकडून आणि नातेवाइकांकडून जवळपास तीन लाख रुपयांची आर्थिक मदत गोळा करण्यात आली. लोप पावत चाललेल्या माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने घडले.

आंबेठाण (ता. खेड) येथील नाभिक समाजातील तरुण कार्यकर्ते कैलास किसन गायकवाड (वय ३६) यांचे २७ जानेवारीला पंढरपूर येथे जात असताना आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मयत गायकवाड हे युवक मित्र म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनामुळे निराधार झालेल्या या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने भविष्यात या कुटुंबाची फरफट होऊ नये या हेतूने या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, मुलांचे शिक्षण मार्गी लागावे यासाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन दशक्रिया विधीप्रसंगी गावचे उपसरपंच शांताराम चव्हाण यांनी केले आणि त्याला उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करीत पाठिंबा दिला.

या वेळी रोख स्वरूपात दोन लाख दोन हजार रुपये व नागरिकांनी जाहीर केलेली; परंतु तत्काळ जमा न झालेली जवळपास एक लाख रुपये मदत मिळाली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, माजी सभापती रामदास माटे, दत्तात्रेय भेगडे, विनोद म्हाळुगकर, तानाजी केंदळे, अमोल पानमंद, सरपंच संघमित्रा नाईकनवरे, उपसरपंच शांताराम चव्हाण, दत्तात्रय मांडेकर, चंद्रकांत चव्हाण, अमोल पानसरे यांच्यासह ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT