2000 incomplete house working in 100 days said uday samant in ratnagiri 
कोकण

Good News : रत्नागिरीतील २ हजार घरे होणार १०० दिवसांत पू्र्ण

राजेश शेळके

रत्नागिरी : शासनाच्या महाआवास अभियानांतर्गत जिल्ह्यात गेल्या 4 वर्षात 2 हजार 142 घरे अपूर्ण आहेत. ही अपूर्ण घरे शंभर दिवसात पूर्ण करायची आहेत. यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी ग्रामीण भागात शिबिर घेऊन तातडीने त्यातील अडीअडचणी सोडवून मार्ग काढावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

महाआवास अभियानाच्या आढाव्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत म्हणाले, महाआवास अभियान चार वर्षे सुरू आहे. योजनेंतर्गत जिल्ह्यात 8 हजार 100 घरांचे उद्दिष्ट होते. यातील 5 हजार 980 घरांना मंजुरी मिळाली तर 3 हजार 838 घरे पूर्ण झाली. परंतु गेली चार वर्षे 2 हजार 142 घरे अपूर्णावस्थेत आहेत. यात 2020-21 मध्ये मंजुरी मिळालेल्या 1 हजार 513 ही सर्व घरे अपूर्ण घरांच्या यादीत आहेत. 

लॉकडाउनमुळे यावर्षी घरबांधणी थांबली होती; मात्र शासनाने या योजनेतील मंजूर झालेली घरे 100 दिवसात पूर्ण झाली पाहिजेत, असे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी ग्रामीण भागात शिबिर घेऊन मंजूर झालेली घरे का रखडली आहेत, याची माहिती घेऊन तातडीने त्यातील त्रुटी दूर कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. 


मेडिकल कॉलेजसाठी आटोकाट प्रयत्न 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजचा विषय लवकरच मार्गी लागणार आहे. रत्नागिरीतही मेडिकल कॉलेज होणार; मात्र सिंधुदुर्गात एमबीबीएस पदवी असेल आणि त्यापुढील एमडी पदवी रत्नागिरी जिल्ह्यात घेता यावी, म्हणून रत्नागिरीतही मेडिकल कॉलेज होण्याच्यादृष्टीने आमचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT