Mango Trees Mandangad Bankot Police esakal
कोकण

वर्षभराची मेहनत वाया! मंडणगडमध्ये आंबा, काजूची 350 झाडे जळून खाक; आग कोणी लावली? पोलिस तपास सुरू

पन्हळी बुद्रुक येथे खासगी मालकीच्या जागेत आग लागल्याने आंबा (Mango Trees) व काजूची ३५० झाडे जळून खाक झाली.

सकाळ डिजिटल टीम

आंबा-काजू मोहोर येण्याच्या काळातच या आगीत झाडे जळून होरपळून गेल्याने यावर्षी यातून मिळणाऱ्या उत्पन्नास मुकावे लागणार आहे.

मंडणगड : पन्हळी बुद्रुक येथे खासगी मालकीच्या जागेत आग लागल्याने आंबा (Mango Trees) व काजूची ३५० झाडे जळून खाक झाली. यात मालकांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात मालक सुरेश विश्राम बोथरे (वय ६४, रा. पन्हळी बुद्रुक) यांनी बाणकोट पोलिसात (Bankot Police) या घटनेसंदर्भात माहिती दिली असून, त्यांचा जवाब नोंदवून पुढील कार्यवाही पोलिसांच्यावतीने सुरू आहे.

बोथरे हे सेवानिवृत्तीनंतर गावी व मुंबईला येऊन जाऊन राहतात. गावात केतकवणेचा खोडा येथे त्यांची आंब्याची व काजूची झाडांची बाग आहे. २९ डिसेंबर २०२३ ला गावातील शेतकरी पांडुरंग दुर्गवले सकाळी ८ वा. गुरे चरवण्यासाठी गेले असताना बोथरे यांना फोन करून त्यांच्या जागेत आग लागलेली असल्याची माहिती दिली.

बोथरे हे गावातील दोघांसमवेत जागेत गेले असता लागलेली आग विझत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संपूर्ण जागेची पाहणी केली असता जागेत ३५० आंबा व काजूची झाडे जळून खाक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी पोलिसपाटील चिंचघर व ग्रामस्थांना याची माहिती दिली. उशिराने पोलिसात या विषयी माहिती दिली. जागेत आग कोणी लावली, याचा तपास कऱण्याची विनंती बोथरे यांनी केली.

वर्षभराची मेहनत वाया

आंबा-काजू मोहोर येण्याच्या काळातच या आगीत झाडे जळून होरपळून गेल्याने यावर्षी यातून मिळणाऱ्या उत्पन्नास मुकावे लागणार आहे. त्यामुळे वर्षभर घेतलेली मेहनत वाया गेली आहे. जंगलात ही आग नेमकी पेटते तरी कशी, हा प्रश्न बोथरे यांच्यासमोर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT