55 year ending topic result was sort out within 2 minutes in ratnagiri chiplun
55 year ending topic result was sort out within 2 minutes in ratnagiri chiplun 
कोकण

५५ वर्षे रखडलेले प्रकरण निघाले २ मिनिटांतच निकाली !

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : तहसील अथवा प्रांत कार्यालयातील विविध कामकाजाची जनतेला माहिती नसल्याने अनेक कामे वर्षानुवर्षे रखडतात. ५५ वर्षापासून रखडलेले वारस नोंदीचे प्रकरण केवळ २ मिनिटात निकाली निघाले. हा चमत्कार वाटावा, असा निर्णय खेर्डी ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या शिबिरात मिळाला. असे आणखीही काही निकाल लागले. प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी सुरू केलेल्या ‘महसूल प्रशासन आपल्या दारी’ उपक्रमाचे हे यश आहे.   

महसूलमधील काही कामांना वारंवार खेपा माराव्या लागत असल्याने ग्रामस्थ त्याकडे दुर्लक्ष करतात. शेतकरी, ग्रामस्थांची कामे एका खेपेत व्हावी, यासाठी उपक्रम राबविण्यास सुरवात केली. खेर्डीत सभागृहातच सर्व यंत्रणा यासाठी उभारल्याने तत्काळ लेखी आदेश संबंधित लाभार्थी व तलाठ्यांना देण्यात आले. महसूल विभागातील प्रामुख्याने मालमत्तेविषयीच्या कामकाजाबाब योग्य सल्ला, मार्गदर्शन मिळत नाही. लोक एजंटाकडे धाव घेतात. 

हे बदलण्यासाठी प्रांत यांनी महसूल प्रशासनच लोकांच्या दारी पोहोचवण्याचे ठरवले. तलाठ्यामार्फत गावात दवंडी देऊन कामकाजाबाबत सर्व दप्तर घेऊन तलाठी शिबिराला आहे. वारस नोंद करणे, उरलेल्या वारसांची नावे लावणे, सहहिस्सेदारांची नावे लावणे आदी प्रकरणे या वेळी निकाली काढण्यात आली. एकाच ठिकाणी संबंधित व्यक्ती, तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्याशी चर्चा करून प्रांत निर्णय देत होते. या निमित्ताने शासकीय योजनांचीही माहिती देण्यात आली. खेर्डी येथे शिरगाव व खेर्डी मंडळातील ४० ते ४५ गावातील ग्रामस्थ आले होते.

"बहुतांशी ग्रामीण लोकांना महसूल विभागाकडील कामकाजाबाबत पुरेशी माहिती नसते. सल्ला व अज्ञानापोटी त्यांची विविध कामे रखडतात. ही कामे मार्गी लागण्यासाठी उपक्रम सुरू आहे."

 - प्रवीण पवार, प्रांत-चिपळूण

५ जणांची नावे नव्हती वारस यादीत

तिवडी येथील घारू बाबू पवार यांचे १९६५ च्या सुमारास निधन झाले होते. त्यांचे एकूण ६ वारस. त्यातील दत्ताराम पवार यांचेच नाव लागले. उर्वरित ५ जणांची नावे वारसांच्या यादीत लागली नव्हती. या प्रकरणी ५ जणांनी कधी तक्रारदेखील केली नव्हती. प्रकाश घारू पवार हे खेर्डीतील शिबिरात आले. माहिती घेतल्यानंतर प्रांतानी दोन मिनिटात उर्वरित वारसांची नावे लावण्याचे आदेश काढले. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT