रत्नागिरी : महाविकास आघाडी शासनाचा धिक्कार करत आणि रद्द करा, रद्द करा वाढीव वीजबिले रद्द करा, अशी मागणी करत आज भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयाबाहेर बिल फाडो आंदोलन करण्यात आले. शासन वीजमाफी करत नाही तोपर्यंत बिलांसाठी कर्मचारी पाठवू नका, अशी तंबी भाजप नेत्यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिली. आपल्या भावना शासनाकडे पोहोचवतो, अशी ग्वाही कार्यकारी अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी भाजप शिष्टमंडळाला दिली.
महावितरणच्या नाचणे येथील कार्यालयाबाहेर सकाळी साडेअकरा वाजता भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच या वेळी भाजपने महावितरणची बिले कार्यालयाबाहेर फाडून टाकली. महाविकास आघाडी सरकार व महावितरणचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, राजेश सावंत, राजू भाटलेकर, सचिन वहाळकर, भैय्या मलुष्टे, उमेश कुळकर्णी, अनिकेत पटवर्धन, संदीप शिंदे, राजन फाळके, ऐश्वर्या जठार, दामोदर लोकरे, राजीव कीर, बिपीन शिवलकर, राजश्री शिवलकर, प्राजक्ता रुमडे, राजेंद्र पटवर्धन व सुमारे 50 कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला.
कार्यकारी अभियंता सायनेकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महावितरणे वाढीव बिले माफ करावी. तसेच बिल आकारणीसाठी कर्मचारी पाठवू नका, अशी मागणी या वेळी सायनेकर यांच्याकडे करण्यात आली. आम्ही कोणाचीही वीज तोडलेली नाही, असे सायनेकर यांनी सांगितले. लोकांनी भरलेल्या बिलामध्ये शासनाच्या आदेशानुसार सवलत मिळू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“रत्नागिरीतील बहुतांशी सर्व जनतेने वीजबिले वेळेत भरली आहेत. मात्र याची दखल शासनाने घेतली नाही. सध्या सर्वसामान्यांना आर्थिक चणचण भासत असताना कोरोना काळात दिलेल्या वाढीव बिलात सवलत मिळालीच पाहिजे.”
- अॅड. दीपक पटवर्धन
संपादन- अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.