cashew
cashew 
कोकण

ओल्या काजुच्या बियांचा हंगाम सुरू

अमित गवळे

पाली : ओल्या काजुच्या बियांची (गर) म्हटले कि सगळ्यांच्याच जिभेला पाणी सुटते. ओल्या काजू बियांच्या (गर) हंगामास सुरुवात झाली आहे. आदिवासी हा रानचा मेवा काढून विकतात. काजू बियांच्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाल्याने बियांचा भाव चढा आहे. तरी देखील खरेदिसाठी खवय्ये लगबग करत आहेत.

रायगड जिल्ह्यातील हवामान आणि मृदा काजूच्या झाडांसाठी पोषक आहे. जिल्ह्यातील निसर्ग सौदर्याने नटलेला डोंगराळ भाग व जंगलामध्ये काजुची झाडे विपुल प्रमाणात आहेत. तसेच अनेक बागायतदारांच्या स्वतःच्या खाजगी काजुच्या बागा देखिल आहेत. सध्या यातील काही झाडांवर काजुच्या बिया येवू लागल्या आहेत. आणि या काजुच्या बिया तोडून आदिवासी महिला बाजारात विकण्यासाठी घेवून येत आहेत. काजुच्या बियांच्या हंगामाची नुकतीच सुरुवात झाली असल्याने त्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत. परिणामी त्यांचा भाव मात्र चढला आहे.  या बिया शेकड्याने किंवा वाट्यावर मिळतात.

सध्या काजू बियांना (गर) अडीचशे ते दोनशे रुपये शेकडा एवढा भाव सुरु आहे. तर मध्यम आकाराचा वाटा तीस ते पंन्नास रुपये इतका आहे. भाव जास्त असला तरी खवय्ये मात्र चढ्या भावाने देखिल काजुच्या बिया खरेदी करत आहेत. साधारण महिन्याभरानंतर उत्पादन वाढल्यावर काजुच्या बिया मुबलक उपलब्ध होतील. त्यामुळे त्यांचा भाव देखिल हळूहळु उतरेल. मे महिन्यापर्यंत ओल्या काजुच्या बियांचा हंगाम सुरु असतो. त्यामुळे अनेकांच्या घरात या काजुच्या बियांची भाजी, पुलाव असे अनेक पदार्थ तयार करुन मोठ्या आवडीने खाल्ले जातात. काजुच्या बिया विकून आदिवासींच्या हाती चांगले पैसे देखिल मिळतात.

चविष्ट काजुच्या बियांची रेसिपी
ओल्या काजुच्या बिया वेगवेगळ्या प्रकारे खाल्या जातात. काजुच्या बियांचा रस्सा किंवा सुकी भाजी करुन खाल्ली जाते. काजुच्या बियांचा पुलाव व बिर्यांनी देखिल केली जाते. तसेच मटन, मच्छी, व सुक्या मासळीमध्ये टाकुन सुद्धा काजुच्या बिया खाल्ल्या जातात. अशा या चिविष्ट आणि स्वादिष्ट बिया जेवणाची लज्जत वाढवितात.

बिया काढण्यासाठी मेहनत आणि हातांची दुरवस्था
आदिवासी बांधवांना दुर्गम, डोंगराळ भागात अाणि जंगलात काजुच्या बिया काढण्यासाठी जावे लागते. अादिवासी बांधव अनवाणी उन्हातान्हात बिया काढण्यासाठी जातात. या बियांना मोठ्या प्रमाणात चिक असतो. अादिवासी बांधव या बिया काढतांना तसेच कापतांना हातात मोजे घालत नाही किंवा कोणतीही सुरक्षितता घेत नाही. त्यामुळे त्यांचे हात चिकामुळे पुर्णपणे खराब होतात. अशा प्रतिकुल परिस्थितीमध्ये अादिवासींना बिया काढून विकाव्या लागतात. शासनाकडून त्यांना हातमोजे देणे तसेच सहाय्य करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT