उदय सामंत e sakal
कोकण

पूरस्थितीवरील कायमस्वरुपी उपाययोजनेसाठी समिती स्थापन ; उदय सामंत

तीन महिन्यांत आराखडा, नदी खोलीकरणासह दीर्घकालीन उपाय

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : चिपळुणात आलेल्या महापुरामुळे परिसरातील गावांचे शेकडो कोटीचे नुकसान झाले. २००५ नंतर पुन्हा चिपळुणात मोठी पूर परिस्थिती उद्भवली. पुराच्या नेहमीच्या परिस्थितीमुळे काही दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेत कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यासाठी सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती तीन महिन्यांत आराखडा तयार करेल. त्यानंतरच उपायोजना राबवण्यास सुरवात होईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर आदी नेहमी पूर येणाऱ्या ठिकाणी दीर्घकालीन उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली आहे.

शहरात २२ जुलै रोजी प्रचंड पूर आल्यानंतर त्याचा सामना करण्यासाठी मुंबई, नवी मुंबई व ठाणे महापालिका व विविध ठिकाणचे अधिकारी व यंत्रणा चिपळूणकरांच्या मदतीसाठी आले होते. गेल्या दहा-पंधरा दिवसांत या यंत्रणेने रात्रंदिवस काम करीत शहरातील सर्व कचरा उचलला. घरे, दुकाने तसेच सार्वजनिक ठिकाणी आलेला चिखल या यंत्रणेच्या माध्यमातून काढण्यात आला. अनेक सामाजिक संस्थांनी या कामी मोलाचे योगदान दिले.

दरम्यान, स्वच्छतामोहीम संपल्यामुळे चिपळूणवासीय तसेच लोकप्रतिनिधींच्यावतीने या मोहिमेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी स्वच्छता मोहिमेची माहिती देताना ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे म्हणाले, शहरातील परिस्थिती पूर्वपदावर होण्याचे काम कठीण होते; मात्र सर्व लोकप्रतिनिधी आणि सहभागी अधिकारी व कर्मचारी, सामाजिक संस्था व तरुणांनी योगदान दिल्याने परिस्थिती लवकर नियंत्रणात आली. या मोहिमेत पंधरा भाग करण्यात आले होते. आणलेली मशिनरीदेखील विभागण्यात आली होती. संपूर्ण शहरात फॉगिंग मशीनद्वारे फवारणी झाली. सुमारे पंधरा हजार टन कचरा उचलण्यात आला. गेली १०-११ दिवस २४ तास शहरात काम सुरू होते. जिथे मशीन जात नाहीत, तिथे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चिखल काढण्यात आला. शेवटच्या टप्प्यात परिट आळीतील काम संपवण्यात आले. या कामी आमदार शेखर निकम यांची मोलाची साथ मिळाली. या वेळी ठाणे महापालिकेच्या उपायुक्त नयन ससाणे, आमदार शेखर निकम, भास्कर जाधव आदी उपस्थित होते.

कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती

मंत्री उदय सामंत म्हणाले, जिल्ह्यात चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर आदी नेहमी पूर येणाऱ्या ठिकाणी दीर्घकालीन उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली आहे. नदी खोलीकरण त्याचबरोबर स्टील पार्किंग आणि विविध बाबींचा यामध्ये समावेश असणार आहे. त्यासाठी अधिकारी सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली आहे. ही समिती तीन महिन्यात पूरग्रस्त भागातील दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा तयार करेल. त्यानंतरच या उपाययोजना राबवण्यास सुरवात केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election Voting: १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, मतदानाच्या दिवशी रजा नाकारणाऱ्या आस्थापनांवर कारवाई

Baba Vanga Predictions 2026: जग मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर? माणसांची निर्णयक्षमता हरवणार, पृथ्वीवर परग्रहवासी येण्याचा दावा

Latest Marathi News Live Update : पुण्यात आज अजित पवारांचा रोड शो

गरम अन्नासाठी Aluminum Foil किंवा Containers वापरता? ही सवय किडनीसह संपूर्ण आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; तज्ज्ञांचा इशारा

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT